आली कुठूनशी कानी धून…
पहाटेचे सूर्यकिरणं धरतीवर उतरताना पक्ष्यांच्या किलबिलाटात दुरून भक्तिगीत कानावर येतं…
मन ताजतवानं होऊ लागतं, रोमारोमात भक्ती उचंबळून यायला लागते, गात्र न् गात्र भक्तिमय होत जातं!
“टाळ बोले चिपळीला” या भजनाचे बोल जगदीश खेबूडकर लिखित… किती भावाशय आहे या शब्दांत…
खरंच… ती दोघे बोलतात…
टाळाची कीणकीण… त्यासंगे चिपळ्यांची लयबद्ध हालचाल… एकाने स्वर धरला की दुसरा साथीला ताल धरतो… मग सुरू होते जुगलबंदी भजनाच्या तालावर!!
भक्तिगीतातील शब्दाचे अर्थ जसे उलगडत जातात, तसे मनामध्ये झिरपत जातात अन् त्या संगीतमय शब्दांना ताल देतात छोटे छोटे वाद्य… टाळ, मृदंग, चिपळ्या, घुंगरू, डफली, तबला, पेटी, एकतारी…
भजनाला साथ द्यायला… बस… एवढे पुरे!! इतकी छान साथसंगत एकमेकांची… मस्त सांगड जमते या वाद्यांची… वातावरण दुमदुमून जातं… भक्तिगीताला फक्त कोणत्याही दोन वाद्यांची गरज असते… पण ते असे काही ठेका धरतात… ते गाणं इतक्या उंचीवर घेऊन जातात की ऐकणारा तल्लीन होऊन जातो. दोन कडव्यांची मधली जागा म्हणजे दोन वाद्यांची जबरदस्त जुगलबंदी… टाळ नाही तर मृदंग… भारावून टाकतं… तन आणि मनसुद्धा!!
तबल्यावर थाप पडली की, पेटीच्या काळ्या-पांढऱ्या पट्ट्या नाचायला लागतात ताल पकडून…
टाळ-चिपळी बोलायला लागले की, त्यांच्यात मृदंग ही शामील… मग काय विचारता नुसती धमाल… कुठल्या कुठे ठेवतो ऐकणाऱ्याला… ब्रह्मानंदी टाळी लागलीच पाहिजे!
हलकेच ती बासरी येते सूर लावत, हीचं काम फार नाजूक, कानात शीळ घुमते तिची हळुवार… राधेला वेड लावलं होतं हिच्या नादमाधुरतेनं…
कान्हा वाजवे बासरी…
अन् होते राधा बावरी…
एकतारी संगे एकरूप झालो…
या भक्तिगीतातील फक्त एकतारीच्या झंकारण्यावर सगळे भक्त विठ्ठलाच्या भजनात आकंठ न्हाऊन निघतात… बाकी वाद्यांची गरज भासली नाही इथे… ईश्वर चरणी लीन होण्यासाठी!!
देवा श्रीगणेशा…
मोठमोठे ढोलताशे एकमेकांना साद घालत टाळ धरतात… हृदयाची धडधड वाढते… कानशीलं गरम व्हायला लागतात… गात्रागात्रात ढोल घुमत जातो… नुसता जोष, भक्तीचा जल्लोष, आसमंत दणदणून जातं!!
विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल… विठ्ठल…
आसमंतात गुंजून जातो वाद्यांचा ताल, सूर आणि… भक्तीच भक्ती!!
पाय ठेक्यावर मागे-पुढे करत…
टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे…
मग चिपळी बोले… नाच नाचूनी अति मी दमले आता जाईन पंढरपुरा
पाहीन पांडुरंगा…
उभी पंढरी नादावली…
माऊली माऊली
माऊली माऊली
रूप तुझे लई भारी
दंगली रंगली सारी पंढरपुरी!!
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…