Rajasthan News : धक्कादायक! रेल्वे रूळांवर सेल्फी घेत दाम्पत्याला पडले महागात

जयपूर : सध्या अनेकांना कोणत्याही ठिकाणी गेल्यास सेल्फी काढण्याचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर लाइक्स कमवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे देखील सांगता येत नाही. राजस्थानमधील सेल्फीचे वेड असणाऱ्या जोडप्याने फोटो काढता जीव धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पावसामुळे हिरवळ झालेल्या वातावरणात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाली जिल्ह्यातील गोरम घाट हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. तिथेच राहुल आणि जान्हवी हे जोडपेही फिरण्यासाठी आले होते. पुलिया येथील एका रेल्वे ट्रॅकवर हे जोडपे उभे राहून सेल्फी घेत होते. मात्र, सेल्फीच्या नादात समोरुन ट्रेन येताच या दोघांनी घाबरुन थेट दरीत उडी मारली. या घटनेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रेस्क्यू करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती नाजूक आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन

West Bengal ED Raid : पश्चिम बंगालमध्ये ईडीअँक्शन मोडवर; एकूण १० ठिकाणी छापेमारी

- अवैध कॉल सेंटरद्वारे फसवणुकीचे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) सोमवारी (१६ मार्च) मोठी

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी