Rajasthan News : धक्कादायक! रेल्वे रूळांवर सेल्फी घेत दाम्पत्याला पडले महागात

जयपूर : सध्या अनेकांना कोणत्याही ठिकाणी गेल्यास सेल्फी काढण्याचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर लाइक्स कमवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे देखील सांगता येत नाही. राजस्थानमधील सेल्फीचे वेड असणाऱ्या जोडप्याने फोटो काढता जीव धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पावसामुळे हिरवळ झालेल्या वातावरणात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाली जिल्ह्यातील गोरम घाट हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. तिथेच राहुल आणि जान्हवी हे जोडपेही फिरण्यासाठी आले होते. पुलिया येथील एका रेल्वे ट्रॅकवर हे जोडपे उभे राहून सेल्फी घेत होते. मात्र, सेल्फीच्या नादात समोरुन ट्रेन येताच या दोघांनी घाबरुन थेट दरीत उडी मारली. या घटनेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रेस्क्यू करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती नाजूक आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ:

फेब्रुवारी २०२६ ला विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाचा आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू सोहळा

नवी दिल्ली : भारतीय नौदल इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत, फेब्रुवारी २०२६ मध्ये आंध्र प्रदेशातील