Rajasthan News : धक्कादायक! रेल्वे रूळांवर सेल्फी घेत दाम्पत्याला पडले महागात

जयपूर : सध्या अनेकांना कोणत्याही ठिकाणी गेल्यास सेल्फी काढण्याचे वेड लागले आहे. सोशल मीडियावर लाइक्स कमवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे देखील सांगता येत नाही. राजस्थानमधील सेल्फीचे वेड असणाऱ्या जोडप्याने फोटो काढता जीव धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पाली जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सध्या पावसामुळे हिरवळ झालेल्या वातावरणात अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पाली जिल्ह्यातील गोरम घाट हा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. तिथेच राहुल आणि जान्हवी हे जोडपेही फिरण्यासाठी आले होते. पुलिया येथील एका रेल्वे ट्रॅकवर हे जोडपे उभे राहून सेल्फी घेत होते. मात्र, सेल्फीच्या नादात समोरुन ट्रेन येताच या दोघांनी घाबरुन थेट दरीत उडी मारली. या घटनेमुळे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही रेस्क्यू करुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती नाजूक आहे. मात्र या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून ५८ लाख नावे वगळली

१२ लाखांहून अधिक मतदार ‘बेपत्ता’ असल्याचे विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत स्पष्ट कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये

भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा! इथियोपियाच्या प्रतिष्ठीत ‘ग्रेट ऑनर निशान’ने पंतप्रधान मोदी सन्मानित

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा