Anant-Radhika Wedding : अंबानींच्या लग्नात चमकली मराठमोळी 'गुलाबी साडी'!

  252

वातावरण गुलाबीमय करण्यासाठी संजू राठोडला अंबानींचं खास निमंत्रण


मुंबई : सध्या देशभरातच नव्हे तर विदेशातही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. जगातील आतापर्यंत सर्वात महागडा ठरलेला हा शाही विवाहसोहळा आहे. या सोहळ्याला अंबानींनी बॉलिवूडसह देश-विदेशातील अनेक कलाकार मंडळींना आमंत्रण दिलं. यात एक आनंदाची बाब म्हणजे डोळे टिपवून टाकणाऱ्या या सोहळ्यात मराठमोळ्या मुलाचं मराठमोळं गाणंदेखील वाजलं आणि त्यावर सर्वांनी ठेका धरला. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या संजू राठोडचं 'गुलाबी साडी' (Gulabi sadi by Sanju Rathod) हे गाणं अंबानींच्या लग्नात वाजलं. यासाठी अंबानींनी संजूला खास निमंत्रणही दिलं होतं.


काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्याने सिनेसृष्टीतल्या सगळ्यांनाच भुरळ घातली. सोशल मीडियावर तर अनेकांनी या गाण्यावर रील्स बनवले. अगदी माधुरीपासून ते अनेक दिग्गजांना या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. आता यातून अंबानी कुटुंब (Ambani Family) देखील सुटलेलं नाही. अनंत अंबानींच्या लग्नात थेट संजू राठोडने उपस्थिती लावली आणि अंबानी कुटुंबियांसह उपस्थितांनी गुलाबी साडी या गाण्यावर ठेका धरला.





आयपीएलमध्येही गाजलेली गुलाबी साडी


गुलाबी साडी या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. या गाण्याला आतापर्यंत २०५ मिलियन्सहून अधिक व्ह्यूज आहेत. हे गाणं लाईव्ह ऐकण्यासाठीही चाहते तितकेच आतुर होतात. आयपीएलच्या हंगामात स्टेडियमवरही संजून हे गाणं गायलं होतं. त्यानंतर आता संजूला थेट अंबानींकडून देखील निमंत्रण मिळालं. यावेळी लग्नमंडपात संजूने गुलाबी साडी हे गाणं गायलं आणि वऱ्हाडींनी त्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर संजूचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यावर अनेकजणांनी कमेंट्स करत संजूचं कौतुक देखील केलं आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.