Anant-Radhika Wedding : अंबानींच्या लग्नात चमकली मराठमोळी 'गुलाबी साडी'!

वातावरण गुलाबीमय करण्यासाठी संजू राठोडला अंबानींचं खास निमंत्रण


मुंबई : सध्या देशभरातच नव्हे तर विदेशातही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. जगातील आतापर्यंत सर्वात महागडा ठरलेला हा शाही विवाहसोहळा आहे. या सोहळ्याला अंबानींनी बॉलिवूडसह देश-विदेशातील अनेक कलाकार मंडळींना आमंत्रण दिलं. यात एक आनंदाची बाब म्हणजे डोळे टिपवून टाकणाऱ्या या सोहळ्यात मराठमोळ्या मुलाचं मराठमोळं गाणंदेखील वाजलं आणि त्यावर सर्वांनी ठेका धरला. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या संजू राठोडचं 'गुलाबी साडी' (Gulabi sadi by Sanju Rathod) हे गाणं अंबानींच्या लग्नात वाजलं. यासाठी अंबानींनी संजूला खास निमंत्रणही दिलं होतं.


काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्याने सिनेसृष्टीतल्या सगळ्यांनाच भुरळ घातली. सोशल मीडियावर तर अनेकांनी या गाण्यावर रील्स बनवले. अगदी माधुरीपासून ते अनेक दिग्गजांना या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. आता यातून अंबानी कुटुंब (Ambani Family) देखील सुटलेलं नाही. अनंत अंबानींच्या लग्नात थेट संजू राठोडने उपस्थिती लावली आणि अंबानी कुटुंबियांसह उपस्थितांनी गुलाबी साडी या गाण्यावर ठेका धरला.





आयपीएलमध्येही गाजलेली गुलाबी साडी


गुलाबी साडी या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. या गाण्याला आतापर्यंत २०५ मिलियन्सहून अधिक व्ह्यूज आहेत. हे गाणं लाईव्ह ऐकण्यासाठीही चाहते तितकेच आतुर होतात. आयपीएलच्या हंगामात स्टेडियमवरही संजून हे गाणं गायलं होतं. त्यानंतर आता संजूला थेट अंबानींकडून देखील निमंत्रण मिळालं. यावेळी लग्नमंडपात संजूने गुलाबी साडी हे गाणं गायलं आणि वऱ्हाडींनी त्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर संजूचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यावर अनेकजणांनी कमेंट्स करत संजूचं कौतुक देखील केलं आहे.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,