Maharashtra Rain : आज कोकणात अतिवृष्टी तर 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी


मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) राज्यभर चांगलीच हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मुंबईमध्येही (Mumbai) पावसाने जोर धरल्याचे दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. अशातच आज अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Heavy Rain) असल्यामुळे हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे.



'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपासून मान्सूनचा वेग वाढला असून तो आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच आज ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



कोकणात काही भागात अतिवृष्टीचा इशारा


हवामान विभागाने आज घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगडमध्ये काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.


दरम्यान रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने काल रेड अलर्ट जारी केला होता. तर आज घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो, असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा