Maharashtra Rain : आज कोकणात अतिवृष्टी तर 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी


मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) राज्यभर चांगलीच हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मुंबईमध्येही (Mumbai) पावसाने जोर धरल्याचे दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. अशातच आज अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Heavy Rain) असल्यामुळे हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे.



'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपासून मान्सूनचा वेग वाढला असून तो आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच आज ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



कोकणात काही भागात अतिवृष्टीचा इशारा


हवामान विभागाने आज घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगडमध्ये काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.


दरम्यान रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने काल रेड अलर्ट जारी केला होता. तर आज घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो, असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व