Maharashtra Rain : आज कोकणात अतिवृष्टी तर 'या' जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी


मुंबई : मुसळधार पावसाने महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) राज्यभर चांगलीच हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मुंबईमध्येही (Mumbai) पावसाने जोर धरल्याचे दिसून येत आहे. जोरदार पावसामुळे वाहतूकसेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. अशातच आज अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार (Heavy Rain) असल्यामुळे हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाने दिले आहे.



'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपासून मान्सूनचा वेग वाढला असून तो आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच आज ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



कोकणात काही भागात अतिवृष्टीचा इशारा


हवामान विभागाने आज घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगडमध्ये काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.


दरम्यान रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने काल रेड अलर्ट जारी केला होता. तर आज घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते आणि सातारा आणि कोल्हापूरमध्ये मैदानी भागात मध्यम पाऊस पडू शकतो, असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा