Amravati Accident : अमरावतीमध्ये भीषण अपघात! भरधाव बसने चौघांना चिरडले

  99

एकाच कुटुंबातील तीन जण जखमी, एकाचा मृत्यू


अमरावती : सातत्याने देशभरात अपघाताच्या (Accident News) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती शहरातूनही एक धक्कादायक (Amravati Accident) माहिती समोर आली आहे. एका भरधाव बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज साडे अकराच्या सुमारास अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या घटनेनंतर बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सध्या घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



जखमींची माहिती


या अपघातामध्ये प्रीतम गोविंद निर्मळे (९) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. प्रीतम बसच्या पुढच्या चाकाखाली आला. तर नर्मदा निर्मळे (६० वर्षे), वैष्णवी संजय निर्मळे आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे निर्मळे कुटुंबावर दु:ख पसरले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या