Nutrition Food : लहानग्यांच्या जीवाशी खेळ! शालेय पोषण आहारात मृत बेडूक

ग्रामस्थांनी विचारला प्रशासनाला जाब


पंढरपूर : मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार (Nutrition Food) पुरवला जात आहे. मात्र शालेय पोषण आहारात सातत्याने अळ्या, किडे, झुरळ, उंदराच्या लेंड्या अशा धक्कादायक गोष्टी आढळत आहेत. त्यामुळे या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच सांगली येथील गर्भवती महिला व बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात मृत वाळा सापाचं पिलू आढळलं होतं.


या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ज्वलंत असताना आणखी अशीच एक घटना पंढरपूर (Pandharpur News) येथे घडली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या शाळेत एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंढरपूरच्या कासेगाव येथील भुसे नगर येथील अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क बेडकाचे मृत पिल्लू (Dead Baby Frog) सापडले आहे. या धक्कादायक घटनेमुळे लहानग्या जीवांशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, शालेय पोषण आहारात अशाप्रकारे मेलेला प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांतून याआधीदेखील असे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे शालेय पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला का? असा प्रश्न पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेतून दिसत आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे