Maratha Vs OBC : सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढल्यास अख्खी मुंबई जाम करु!

लक्ष्मण हाकेंचा इशारा तर दुसरीकडे मराठ्यांनी दिलेल्या मुदतीचा अखेरचा दिवस


राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न


मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष (Maratha Vs OBC) शिगेला पोहोचला आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे हा अध्यादेश काढल्यास अख्खी मुंबई जाम करु, असा इशारा ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला आहे. या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे.


सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम संपत असून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शांतता रॅली काढणार आहेत. यावेळी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला अध्यादेश न काढण्याचा कडक इशारा दिला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात. आम्ही ६० टक्के ओबीसींनी तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अशी विनंती लक्ष्मण हाके यांनी केली आहे. इतकंच नाही, तर तुम्ही सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर आम्ही राज्यातील सर्व ओबीसी बांधव मुंबईत येऊन चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे एकाबाजूला मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना दिलेला शब्द आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकारच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘वंदे भारत’च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या सविस्तर

पुणे: सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भारतील अनेक

विवाहासाठी दिव्यांगांना आता मिळणार अडीच लाख रुपये, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सोलापूर : दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, दिव्यांग आत्मनिर्भर बनावा, विवाहापासून

निकालाआधी अनगरमध्ये भाजपने उधळला गुलाल! पहिल्यांदाच निवडणूक आणि बिनविरोध निवड

सोलापूर : सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असली तरी ही निवडणूक

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला अपघात

अमरावती : अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतले आमदार संजय खोडकेंच्या वाहनाला

Crime News : जमिनीचा तुकडा की रक्ताचा सडा? अर्ध्या गुंठ्यासाठी पोटच्या गोळ्याने जन्मदात्यांचे डोके ठेचले; हुपरी हादरली! सैतानी क्रूरता

हुपरी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरात एका माथेफिरू मुलाने केवळ मालमत्तेच्या वादातून आपल्या वृद्ध