Maratha Vs OBC : सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढल्यास अख्खी मुंबई जाम करु!

  56

लक्ष्मण हाकेंचा इशारा तर दुसरीकडे मराठ्यांनी दिलेल्या मुदतीचा अखेरचा दिवस


राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न


मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष (Maratha Vs OBC) शिगेला पोहोचला आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे हा अध्यादेश काढल्यास अख्खी मुंबई जाम करु, असा इशारा ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला आहे. या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे.


सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम संपत असून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शांतता रॅली काढणार आहेत. यावेळी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला अध्यादेश न काढण्याचा कडक इशारा दिला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात. आम्ही ६० टक्के ओबीसींनी तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अशी विनंती लक्ष्मण हाके यांनी केली आहे. इतकंच नाही, तर तुम्ही सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर आम्ही राज्यातील सर्व ओबीसी बांधव मुंबईत येऊन चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे एकाबाजूला मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना दिलेला शब्द आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकारच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची