Anandacha Shidha : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवात मिळणार 'आनंदाचा शिधा'

  221

दीड कोटीहून अधिक कुटुंबांना होणार लाभ


पुणे : राज्यातील रेशनकार्ड (Ration Card) धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारक सर्व नागरिकांना 'आनंदाचा शिधा' (Anandacha Shidha) वाटप करण्यात येणार असा ठराव मांडला होता. त्यानुसार ११मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत गुढीपाडवा (Gudipadwa) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti) ‘आनंदाचा शिधा’ वितरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता गणेशोत्सवातही (Ganeshotsav) राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारक नागरिकांचा यंदाचा गणेशोत्सव आणखी उत्साहदायक होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. याबाबत ⁠राज्य सरकारकडून जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल १ कोटी ७० लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे. या वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसांत पूर्ण करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.



आनंदाच्या शिध्यात मिळणार या गोष्टी


गणेशोत्सवातील आनंदाचा शिधा वाटप हा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात होणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रूपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी १ किलो रवा, चणाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या