Nawab Malik : नवाब मलिक पुन्हा तुरुंगात जाणार? आज जामिनाचा अखेरचा दिवस!

सुप्रीम कोर्टात आज पार पडणार सुनावणी


मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामिनाचा आज शेवटचा दिवस आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांना आजारपणाच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला होता. ते तुरुंगात असताना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली होती. बाहेर आल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार (Ajit Pawar) दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. अनेक दिवस मलिक आपली भूमिका स्पष्ट करु शकले नव्हते. अखेर त्यांनी अजितदादांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज नवाब मलिकांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे मलिक तुरुंगात जाणार की त्यांच्या जामिनात मुदतवाढ होणार याच फैसला आज होणार आहे.


मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर १४ मध्ये आज ६१ व्या नंबर वर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.



नेमकं प्रकरण काय?


नवाब मलिक यांना ईडीने २०२२ मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. नंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता. मात्र एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व