मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर वरूण राजा पुन्हा एकदा मुंबईत जोरदार कोसळत आहे. पहाटेपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे.


जोरदार पावसामुळे अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने कामावर जाणाऱ्या लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.


रेल्वे उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या ठाणे, दादर, कल्याण तसेच कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. एक आठवड्याआधीच मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. या पावसात संपूर्ण रेल्वेची व्यवस्थाच कोलमडून गेली होती.


शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

Narhari Zirwal : तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतर दूध संकलनात २५ टक्के घट

- मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली; विधानभवनात येणाऱ्या अन्नाचीही तपासणी होणार मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,