मुंबईत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई: दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर वरूण राजा पुन्हा एकदा मुंबईत जोरदार कोसळत आहे. पहाटेपासूनच मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे याचा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे.


जोरदार पावसामुळे अनेक रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने कामावर जाणाऱ्या लोकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.


रेल्वे उशिराने धावत असल्याने मध्य रेल्वेच्या ठाणे, दादर, कल्याण तसेच कुर्ला या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. एक आठवड्याआधीच मुंबईत जोरदार पाऊस झाला होता. या पावसात संपूर्ण रेल्वेची व्यवस्थाच कोलमडून गेली होती.


शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारपासून मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments
Add Comment

करनिर्धारण व संकलन विभागासाठी ५०० संगणक खरेदीला मंजुरी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाकरता तब्बल ५०० संगणक खरेदी केले जात असून एका संगणकासाठी १

BMC : महापालिकेच्या वाहन कंत्राटावर संशयाची सावली

‘आधी ऑडिट करा, मगच पैसे द्या’ सहा महिन्यांच्या मुदतवाढीत आर्थिक विसंगतीचा भाजपचा आरोप स्थायी समितीत गाजला

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर