पुण्यात मनपाच्या वसतिगृहात दारु पार्टी

  44

पार्टीबाज १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी


पुणे (प्रतिनिधी): शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तरूणाई वेगळ्याच वाटेवर चालल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यात चांगले शिक्षण घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातून धक्कादायक घटना घडली आहे. या वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा वाढत असल्याने इतर शांत विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार शहरातील घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील आहे.


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी पुणे महानगरपालिकेने घोले रोड येथ १०८ खोल्यांचे मोठे वसतिगृह बांधण्यात आलेले आहे. या वसतीगृहात ४०० जणांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. शहराच्या मध्य भागामध्ये विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो. मात्र त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना शांततेत शिकता येत नसल्याचे दिसून येत आहे.


एका बाजूला विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय, जेवणासाठी पैसे दिले जात असताना दुसरीकडे वसतिगृहात दारू पिणे आणि बाकी गोष्टी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, तंबाखू यासारख्या गोष्टी सापडल्या आहेत. शिकण्यासाठी जिथे विद्यार्थी येतात, तिथे हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाकडून १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या