पुण्यात मनपाच्या वसतिगृहात दारु पार्टी

  40

पार्टीबाज १४ विद्यार्थ्यांची हकालपट्टी


पुणे (प्रतिनिधी): शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तरूणाई वेगळ्याच वाटेवर चालल्याचे चित्र दिसून येत आहे. पुण्यात चांगले शिक्षण घेण्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोईसाठी बांधण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातून धक्कादायक घटना घडली आहे. या वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा टीव्ही बंद असणे, कुचकामी सुरक्षा व्यवस्थेमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांमधील बेशिस्तपणा वाढत असल्याने इतर शांत विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी या ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार शहरातील घोले रोडवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील आहे.


महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोईसाठी पुणे महानगरपालिकेने घोले रोड येथ १०८ खोल्यांचे मोठे वसतिगृह बांधण्यात आलेले आहे. या वसतीगृहात ४०० जणांच्या राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. शहराच्या मध्य भागामध्ये विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळतो. मात्र त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना शांततेत शिकता येत नसल्याचे दिसून येत आहे.


एका बाजूला विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय, जेवणासाठी पैसे दिले जात असताना दुसरीकडे वसतिगृहात दारू पिणे आणि बाकी गोष्टी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, तंबाखू यासारख्या गोष्टी सापडल्या आहेत. शिकण्यासाठी जिथे विद्यार्थी येतात, तिथे हा प्रकार समोर आल्यानंतर समाज विकास विभागाकडून १४ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित