Samruddhi Highway : वर्षभरातच समृद्धी महामार्ग खचला! भेगा पडल्याने अपघाताचा वाढला धोका

एमएमआरडीसीचा दावा ठरला फोल


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Highway) पाहिले जाते. मात्र या महामार्गाचे उद्घाटन होऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झाले नसून समृद्धी महामार्ग खचत चालला असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून (Chhatrapati Sambhajinagar) जवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ भेगा पडल्या आहेत. ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा व काही ठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गावर अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



एमएमआरडीसीचा अंदाज फोल


महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावा एमएसआरडीसीने (MMRDC) केला होता. मात्र आता तो फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. तसेच माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे चालकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन केले आहे.


दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघाताचे वाढते सत्र तसेच भेगा व खड्ड्यांसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र याबाबतीत प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे.



समृद्ध महामार्ग लवकरच पूर्णपणे खुला होणार


समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी पैकी ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना