Samruddhi Highway : वर्षभरातच समृद्धी महामार्ग खचला! भेगा पडल्याने अपघाताचा वाढला धोका

एमएमआरडीसीचा दावा ठरला फोल


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Highway) पाहिले जाते. मात्र या महामार्गाचे उद्घाटन होऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झाले नसून समृद्धी महामार्ग खचत चालला असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून (Chhatrapati Sambhajinagar) जवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ भेगा पडल्या आहेत. ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा व काही ठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गावर अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



एमएमआरडीसीचा अंदाज फोल


महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावा एमएसआरडीसीने (MMRDC) केला होता. मात्र आता तो फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. तसेच माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे चालकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन केले आहे.


दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघाताचे वाढते सत्र तसेच भेगा व खड्ड्यांसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र याबाबतीत प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे.



समृद्ध महामार्ग लवकरच पूर्णपणे खुला होणार


समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी पैकी ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये