Samruddhi Highway : वर्षभरातच समृद्धी महामार्ग खचला! भेगा पडल्याने अपघाताचा वाढला धोका

एमएमआरडीसीचा दावा ठरला फोल


छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Highway) पाहिले जाते. मात्र या महामार्गाचे उद्घाटन होऊन अद्याप एक वर्षही पूर्ण झाले नसून समृद्धी महामार्ग खचत चालला असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून (Chhatrapati Sambhajinagar) जवळ असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ भेगा पडल्या आहेत. ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा व काही ठिकाणी खड्डे पडल्याने महामार्गावर अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



एमएमआरडीसीचा अंदाज फोल


महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नाहीत, असा दावा एमएसआरडीसीने (MMRDC) केला होता. मात्र आता तो फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. तसेच माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे चालकांनी काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन केले आहे.


दरम्यान, समृद्धी महामार्गावरील अपघाताचे वाढते सत्र तसेच भेगा व खड्ड्यांसंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र याबाबतीत प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे.



समृद्ध महामार्ग लवकरच पूर्णपणे खुला होणार


समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी पैकी ६२५ किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा