Nashik News : नाशिककरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

नाशिक : महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने (Maharashtra Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र नाशिकमध्ये (Nashik) हवा तितका पाऊस न झाल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) अजूनही कमालीची घट जाणवत आहे. त्यामुळे नाशिककरांना दररोज पाणीकपातीच्या (Water Shortage) समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच नाशिकमध्ये एक दिवसासाठी पाणी येणार नसल्यामुळे (Water Supply) नाशिककरांना पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी विभागाकडून देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या शनिवारी शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील पाणीपुरवठा विभागाकडून मुकणे धरण येथून पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. मुख्य गुरुत्ववाहिनीवर देखभाल-दुरुस्तीचे व व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या, व्हॉल्व्ह बदलणे तसेच गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथील उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.


दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून पूर्ण दिवस सुरु राहणार आहे. तसेच रविवारी होणारा सकाळचा पाणीपुरवठा देखील कमी दाबाने होईल. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा


नाशिकमधील धरणातील पाण्यासाठ्यात ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच वरुणराजाने पाठ फिरवल्यास शहराला भीषण पाणीबाणीला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या