Hitendra Thakur : पालघर जिल्ह्याची प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार!

बैठकीत जिल्ह्यातील समस्यांकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष


पालघर : वसईचे आ. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी अधिवेशनाच्या काळात गेल्या दोन दिवसांत विविध खात्यांच्या मंत्र्यांची विधिमंडळात भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. राजेश पाटील, आ. निरंजन डावखरे, माजी महापौर नारायण मानकर व अन्य सहकारी उपस्थित होते.


दर अधिवेशनात वसईचे आ. हितेंद्र ठाकूर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासाच्या प्रश्नावर विविध विभागाच्या मंत्र्यांचे लक्ष वेधत असतात. या अधिवेशनातही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, रस्त्याची दुर्दशा, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती व मासेमारी व्यवसायातील प्रश्न इ. समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.


बैठकीत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Guardian Minister Ravindra Chavan) या तिघांनी आ. ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावू, असे सांगितले. यावेळी आ. ठाकूर यांनी महानगरपालिकेला शासनाकडून मिळणारी अनुदाने वेळेवर मिळावीत, अशी आग्रही मागणी केली. ती उभयतांनी मान्य केली. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याची सर्व प्रलंबित विकासकामांचा निपटारा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि

Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

Bhoot Bangla : धुरंधर २ सिनेमामुळे अक्षयचा 'भूत बंगला' पुन्हा लांबणीवर जाणार ?

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. अक्षय कुमारचा भूत बंगला या