Hitendra Thakur : पालघर जिल्ह्याची प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार!

बैठकीत जिल्ह्यातील समस्यांकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष


पालघर : वसईचे आ. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी अधिवेशनाच्या काळात गेल्या दोन दिवसांत विविध खात्यांच्या मंत्र्यांची विधिमंडळात भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. राजेश पाटील, आ. निरंजन डावखरे, माजी महापौर नारायण मानकर व अन्य सहकारी उपस्थित होते.


दर अधिवेशनात वसईचे आ. हितेंद्र ठाकूर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासाच्या प्रश्नावर विविध विभागाच्या मंत्र्यांचे लक्ष वेधत असतात. या अधिवेशनातही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, रस्त्याची दुर्दशा, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती व मासेमारी व्यवसायातील प्रश्न इ. समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.


बैठकीत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Guardian Minister Ravindra Chavan) या तिघांनी आ. ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावू, असे सांगितले. यावेळी आ. ठाकूर यांनी महानगरपालिकेला शासनाकडून मिळणारी अनुदाने वेळेवर मिळावीत, अशी आग्रही मागणी केली. ती उभयतांनी मान्य केली. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याची सर्व प्रलंबित विकासकामांचा निपटारा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

१५ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी

कोणत्या देशानं घेतला निर्णय? कोपनहेगन : मुलांना व्यसनापासून वाचवण्यासाठी डेनमार्क सरकारनं एक मोठा निर्णय घेतला

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठा डेटा सेंटर; ‘गुगल’ ची १० अब्ज डॉलर्सची मेगा गुंतवणूक

विशाखापट्टणम : टेक कंपनी गूगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी