Hitendra Thakur : पालघर जिल्ह्याची प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार!

बैठकीत जिल्ह्यातील समस्यांकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष


पालघर : वसईचे आ. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी अधिवेशनाच्या काळात गेल्या दोन दिवसांत विविध खात्यांच्या मंत्र्यांची विधिमंडळात भेट घेऊन पालघर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत आ. राजेश पाटील, आ. निरंजन डावखरे, माजी महापौर नारायण मानकर व अन्य सहकारी उपस्थित होते.


दर अधिवेशनात वसईचे आ. हितेंद्र ठाकूर जिल्ह्याच्या प्रलंबित विकासाच्या प्रश्नावर विविध विभागाच्या मंत्र्यांचे लक्ष वेधत असतात. या अधिवेशनातही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, रस्त्याची दुर्दशा, वीज, शिक्षण, आरोग्य, शेती व मासेमारी व्यवसायातील प्रश्न इ. समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.


बैठकीत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Guardian Minister Ravindra Chavan) या तिघांनी आ. ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला व प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावू, असे सांगितले. यावेळी आ. ठाकूर यांनी महानगरपालिकेला शासनाकडून मिळणारी अनुदाने वेळेवर मिळावीत, अशी आग्रही मागणी केली. ती उभयतांनी मान्य केली. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याची सर्व प्रलंबित विकासकामांचा निपटारा लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

हा फक्त राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून

देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या

भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५