नांदेड : मराठवाड्यातील (Marathwada) नागरिकांना उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही पाणीबाणीसारख्या (Water Shortage) समस्यांना सामोरे जावे लागले होते. भीषण पाणीटंचाईमुळे (Water Crisis) मराठवाड्यातील नागरिकांचा जीव टांगणीला आला होता. काही दिवसांपासून या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळत असताना आता पुन्हा मोठा धक्का सहन करावा लागत आहे. आज मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एक जिल्ह्यात भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही धरणीकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान नांदेड (Nanded), हिंगोली, परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील वाशीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी असून भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १३ किमीवरील दांडेगाव परिसरात असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, २ महिन्यांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या भूकंपाच्या धक्क्यासंदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…