Earthquake : भूकंपाने मराठवाडा-विदर्भ हादरला!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


नांदेड : मराठवाड्यातील (Marathwada) नागरिकांना उन्हाळ्यासह ऐन पावसाळ्यातही पाणीबाणीसारख्या (Water Shortage) समस्यांना सामोरे जावे लागले होते. भीषण पाणीटंचाईमुळे (Water Crisis) मराठवाड्यातील नागरिकांचा जीव टांगणीला आला होता. काही दिवसांपासून या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळत असताना आता पुन्हा मोठा धक्का सहन करावा लागत आहे. आज मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एक जिल्ह्यात भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही धरणीकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सव्वा सात वाजेच्या दरम्यान नांदेड (Nanded), हिंगोली, परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील वाशीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी असून भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून १३ किमीवरील दांडेगाव परिसरात असल्याची माहिती मिळत आहे.



'या' भागात भूकंपाचा धक्का



  • परभणी जिल्ह्यातील सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे.

  • मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावातील लोकांच्या घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला. त्यामुळे गोठ्यात बांधलेल अनेक जनावरे देखील भयभीत होऊन बाहेर पडण्यासाठी धडपडत होते

  • मराठवाड्यातील नांदेड तसेच जालना जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.


दरम्यान, २ महिन्यांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या भूकंपाच्या धक्क्यासंदर्भात अद्याप प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक; २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, मतदानासाठी

मुलगा व्हावा म्हणून छळ; पैशांच्या मागणीला कंटाळून २५ वर्षीय गर्भवतीची आत्महत्या

नांदेड : मुलाच्या हव्यासापोटी आणि पैशांच्या सततच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय गर्भवती विवाहितेने

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

मतदानाच्या तोंडावर २० जिल्ह्यांत तारखांमध्ये बदल

नगर परिषदांसाठी २ ऐवजी २० डिसेंबरला मतदान राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय बारामती, मंगळवेढ्यासह अनेक नगर

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावपळ, कॉल करणारा जेरबंद

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर शुक्रवारी