Vegetable Price Hike : मुसळधार पावसाचा भाजीपाल्यावर फटका!

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरही झाला आहे. सर्वसामान्यांना एकीकडे वाढत्या महागाईचा फटका बसत असताना आता त्यात मुसळधार पावसाचीही भर पडत आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्यांची (Vegetable Price Hike) आवक कमी मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा फटका बसलेला शेतमाल बाजारात येत आहे. तसेच आवक कमी झाल्याने काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. टोमॅटो, मिरची, भेंडी, आणि फुलकोबी याचे दर हे १०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर कांदे आणि बटाटे ६० ते ७० रुपये पर्यंत आहे. भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट (Kitchen Budget) कोलमडले आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा