Vegetable Price Hike : मुसळधार पावसाचा भाजीपाल्यावर फटका!

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरही झाला आहे. सर्वसामान्यांना एकीकडे वाढत्या महागाईचा फटका बसत असताना आता त्यात मुसळधार पावसाचीही भर पडत आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्यांची (Vegetable Price Hike) आवक कमी मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा फटका बसलेला शेतमाल बाजारात येत आहे. तसेच आवक कमी झाल्याने काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. टोमॅटो, मिरची, भेंडी, आणि फुलकोबी याचे दर हे १०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर कांदे आणि बटाटे ६० ते ७० रुपये पर्यंत आहे. भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट (Kitchen Budget) कोलमडले आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी

नवरात्रौत्सवात झेंडूचे दर वाढले, उत्पादन घटल्याने किंमतीवर परिणाम

रायगड : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना जोरदार मागणी असून, बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात

महालक्ष्मी मंदिरात नवरात्री उत्सवासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर: ११ दिवसांचा नवरात्रोत्सव आज 'करवीर निवासिनी' अंबाबाई, श्री महालक्ष्मी मंदिरात 'घटस्थापना'सह उत्साहात

मुंब्रामध्ये कंटेनरची दुचाकीला धडक, तीन मुलांचा जागीच मृत्यू

ठाणे : मुंब्रामध्ये भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ३ मुलांना कंटेनरने

अतिवृष्टीमुळे संगोबा गावातील शेतीचे मोठे नुकसान – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा पाहणी दौरा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगोबा गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला

सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ला धनगर आरक्षणासाठी उपोषणस्थळी जात असताना घडली घटना जालना