Sunita Williams : अंतराळात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीशी साधणार संवाद!

'इतक्या' दिवसांत परतणार पृथ्वीवर; नासाने दिली महत्त्वाची अपडेट


मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) देखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये (Starliner) तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. १४ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते, मात्र या बिघाडामुळे ते अद्याप परतू शकलेले नाहीत. त्यामुळे जगभरातून काळजी व्यक्त होत असतानाच या प्रकरणी नासाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार येत्या ४५ दिवसांच्या आत हे दोन्ही अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर पोहोचणार आहेत. तसेच उद्या १० जुलै रोजी रात्री ८:३० वाजता ते पृथ्वीशी संवाद साधणार आहेत.


सुनीता विल्यम्स यांच्या परतीबद्दल वेगळवेगळ्या अफवा पसरत असताना नासाने दिलेल्या या माहितीमुळे जगभरातील लोकांना दिलासा मिळाला आहे. अंतराळवीर बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानाने अवकाश भरारी घेण्यापूर्वीच हे मिशन काही कारणास्तव रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हे अंतराळवीर अवकाश स्थानकावर पोहोचल्यानंतर अंतराळयानात तांत्रिक अडचणी आल्याने परतीच्या वेळेत तीन वेळा बदल करण्याची वेळ आली.


अंतराळ स्थान केंद्रावर सध्या ९ सदस्यीय अंतराळवीर दल कार्यरत आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थान केंद्रावर एक महिन्यापेक्षा जास्त काळ घालवला आहे. ही वाढीव मुदत असून त्यांचे प्रारंभिक नियोजन केवळ १० दिवसांचे होते. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अंतराळ स्थान केंद्रावर सुरक्षित असून १० जुलैला रात्री ८:३० वाजता पृथ्वीशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती नासाने दिली आहे.


सुनीता विलियम्स यांनी अंतराळ स्थान केंद्रावर गेल्या चार आठवड्यांत येणाऱ्या मोहिमांसाठी लागणारे उपकरण आणि सामान वेगळे करण्याचे काम केले आहे. त्यांनी अंतराळ स्थान केंद्राच्या फिल्टर्सची हवा वाहतुकीची देखरेखही केली. थोडक्यात, अंतराळातील अंतराळवीरांचे काम खूप महत्वाचे आहे. येत्या ४५ दिवसांतच त्या पृथ्वीवर पोहोचतील, अशी सर्वांना आशा आहे.


Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,