Sunita Williams : अंतराळात अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीशी साधणार संवाद!

'इतक्या' दिवसांत परतणार पृथ्वीवर; नासाने दिली महत्त्वाची अपडेट


मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) देखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये (Starliner) तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. १४ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते, मात्र या बिघाडामुळे ते अद्याप परतू शकलेले नाहीत. त्यामुळे जगभरातून काळजी व्यक्त होत असतानाच या प्रकरणी नासाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार येत्या ४५ दिवसांच्या आत हे दोन्ही अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर पोहोचणार आहेत. तसेच उद्या १० जुलै रोजी रात्री ८:३० वाजता ते पृथ्वीशी संवाद साधणार आहेत.


सुनीता विल्यम्स यांच्या परतीबद्दल वेगळवेगळ्या अफवा पसरत असताना नासाने दिलेल्या या माहितीमुळे जगभरातील लोकांना दिलासा मिळाला आहे. अंतराळवीर बोइंग स्टारलाइनर अंतराळ यानाने अवकाश भरारी घेण्यापूर्वीच हे मिशन काही कारणास्तव रद्द करण्यात आले होते. त्यानंतर हे अंतराळवीर अवकाश स्थानकावर पोहोचल्यानंतर अंतराळयानात तांत्रिक अडचणी आल्याने परतीच्या वेळेत तीन वेळा बदल करण्याची वेळ आली.


अंतराळ स्थान केंद्रावर सध्या ९ सदस्यीय अंतराळवीर दल कार्यरत आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी अंतराळ स्थान केंद्रावर एक महिन्यापेक्षा जास्त काळ घालवला आहे. ही वाढीव मुदत असून त्यांचे प्रारंभिक नियोजन केवळ १० दिवसांचे होते. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स अंतराळ स्थान केंद्रावर सुरक्षित असून १० जुलैला रात्री ८:३० वाजता पृथ्वीशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती नासाने दिली आहे.


सुनीता विलियम्स यांनी अंतराळ स्थान केंद्रावर गेल्या चार आठवड्यांत येणाऱ्या मोहिमांसाठी लागणारे उपकरण आणि सामान वेगळे करण्याचे काम केले आहे. त्यांनी अंतराळ स्थान केंद्राच्या फिल्टर्सची हवा वाहतुकीची देखरेखही केली. थोडक्यात, अंतराळातील अंतराळवीरांचे काम खूप महत्वाचे आहे. येत्या ४५ दिवसांतच त्या पृथ्वीवर पोहोचतील, अशी सर्वांना आशा आहे.


Comments
Add Comment

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी