Ashadhi Wari : आषाढी वारीत पंढरपुरात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी!

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज


पंढरपूर : यंदाच्या आषाढीवारीत (Ashadhi Wari 2024) वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस यंत्रणा संपूर्णरित्या सज्ज झाली आहे. मात्र सध्या सातत्याने वाढत चाललेल्या अपघातांचे (Accident) सत्र रोखण्यासाठी तसेच मंदिर परिसरात भाविकांच्या अंगावरील दागिने पळवण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांदरम्यान आता पंढरपूरमध्ये येणाऱ्या सर्व वाहनांची कडक तपासणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तपासणी दरम्यान कोणताही चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवताना (Drunk And Drive) आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई (Strict Action) करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आषाढी वारीत तळीरामांना चांगलाच चाप बसणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातून गेल्या काही दिवसांत मंदिर परिसरात भाविकांच्या अंगावरील दागिने पळवण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच पोलिसांनी नामदेव पायरी येथे चोरीला गेलेले भाविकांचे २४ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने शोधून काढले होते. त्यादरम्यान शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी १३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३४ तोळे ४ ग्रॅम सोने हस्तगत केले. मात्र आता चोरीचा आणि अपघाताचा फटका वारकऱ्यांना बसू नये यासाठी पोलिसांनी उपाययोजना काढल्या आहेत.



अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी


११ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि १२ जुलै रोजी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची तयारी पूर्ण झाल्याचे सरदेशपांडे यांनी सांगितले. यासाठी पालखी जिल्ह्यात आल्यावर कोणती वाहतूक कुठून वळवायची, याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणतीही अवजड वाहतूक पंढरपूर शहरात येणार नाही, याची काळजी घेतल्याचीही माहिती मिळत आहे.



ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणी


सध्या ड्रंक अँड ड्राईव्ह तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात चालकांनी मद्य प्राशन केल्याचे आढळून येत आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई देखील केली जात आहे. अशा मद्यपी चालकांचा भाविक किंवा वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्व पालखी मार्गांवर तपासणी आणि गस्त सुरू ठेवली आहे. त्यासोबत गर्दी असणाऱ्या सर्व ठिकाणी प्रशिक्षित टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक टोल नाक्यावर ड्रंक अँड ड्राइव्ह संदर्भात मोठ्या प्रमाणात तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी