Police recruitment : पावसामुळे महिला पोलीस भरतीत मोठी अडचण!

भरती पुढे ढकलण्याची अमरावतीतून मागणी


अमरावती : मुंबईसह राज्याच्या विविध भागांना सध्या पावसाने झोडपून (Heavy rainfall) काढले आहे. अमरावतीत (Amravati) देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र याचा फटका अमरावतीतील पोलीस भरती परिक्षेला (Police recruitment) बसला आहे. पोलीस भरतीची प्रात्यक्षिक परीक्षा ज्या मैदानावर होणार आहे, त्या ठिकाणी सर्वत्र पाणी साचलं आहे. त्यामुळे परीक्षा देताना परीक्षार्थींना अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमरावतीमधून करण्यात येत आहे.


सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांत महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले आहे. ग्राऊंडवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना धावणे व इतर शारीरिक चाचणी करणे अशक्य आहे. त्यामुळे भरती पुढे ढकलण्याची मागणी भरतीसाठी आलेल्या मुलींनी केली आहे.


सकाळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने मुली या मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम बाहेर जमल्या असून आजची पोलीस पोलीस भरती पुढे ढकलण्याची आक्रमक मागणी मुलींनी केली आहे.

Comments
Add Comment

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात