अमरावती : मुंबईसह राज्याच्या विविध भागांना सध्या पावसाने झोडपून (Heavy rainfall) काढले आहे. अमरावतीत (Amravati) देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र याचा फटका अमरावतीतील पोलीस भरती परिक्षेला (Police recruitment) बसला आहे. पोलीस भरतीची प्रात्यक्षिक परीक्षा ज्या मैदानावर होणार आहे, त्या ठिकाणी सर्वत्र पाणी साचलं आहे. त्यामुळे परीक्षा देताना परीक्षार्थींना अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमरावतीमधून करण्यात येत आहे.
सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांत महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले आहे. ग्राऊंडवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना धावणे व इतर शारीरिक चाचणी करणे अशक्य आहे. त्यामुळे भरती पुढे ढकलण्याची मागणी भरतीसाठी आलेल्या मुलींनी केली आहे.
सकाळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने मुली या मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम बाहेर जमल्या असून आजची पोलीस पोलीस भरती पुढे ढकलण्याची आक्रमक मागणी मुलींनी केली आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…