पुण्यात सैराट! चिडलेल्या भावाने केला मेहुण्याचा खून

पुणे : आंतरधर्मीय विवाहामुळे उद्भवलेल्या संतापातून रांधे (ता. पारनेर) येथील एका तरुणाचा मोशी (भोसरी, पुणे) येथील औद्योगिक परिसरात खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणासोबत आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलीच्या भावाने नातेवाईकांच्या मदतीने हा खून केल्याचे उघड झाले आहे. तीन आठवड्यांपूर्वी (१५ जून) घडलेल्या या घटनेचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यश मिळवले आहे.


हत्या झालेल्या तरुणाचे नाव आमिर शेख आहे. आमिरच्या हत्येप्रकरणी पंकज विश्वनाथ पाईकराव, गणेश दिनेश गायकवाड, सुशांत गोपाळा गायकवाड, सुनील किसन चक्रनारायण यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या झोन तीनचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार, रांधे येथील आमिर शेख आणि त्याच्या शेजारी राहणा-या मुलीने चार महिन्यांपूर्वी आळंदी (पुणे) येथे आंतरधर्मीय विवाह केला होता. त्यानंतर ते मोशी (भोसरी, पुणे) येथे राहत होते. आमिर खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या संतापातून तिच्या भावाने मेहुणा आणि नातेवाईकांच्या मदतीने १५ जून रोजी आमिरचा गळा आवळून खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी नेऊन जाळला. दरम्यान, आमिरच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती. आमिरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा केला.


आमिर शेख आणि त्याच्या शेजारी राहणा-या मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यांच्या कुटुंबांनी २० वर्षांपासून शेजारी राहत होते आणि त्यांच्या संबंधात सलोखा होता. मात्र, प्रेमविवाहामुळे मोठी दरी निर्माण झाली.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या