Kalyan news : कल्याणच्या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश

मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश


कल्याण : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर या गावांचा नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून नवीमुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.


कल्याण ग्रामीण भागात असलेल्या १४ गावांचा नवी मुंबई प्रवेशासाठी संघर्ष सुरु होता. सलग सहा वेळा लागलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर विकास समितीने बहिष्कार टाकून आपली एकजूट दाखवली होती. सतत ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकून शासनाला निर्णय घेण्यास समितीकडून भाग पाडण्यात आलं होतं. १४ गावांचा नवी मुंबई प्रवेशाचा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी १४ गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र गावं समाविष्ट करण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली नसल्याने गाव विकास समिती आणि मनसेचे आमदार राजू पाटील त्याबाबत पाठपुरावा देखील करत होते.


अखेर मनसे आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश आले असून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '१४ गावांचा' नवी मुंबई पालिकेत समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.


नवी मुंबई पालिकेच्या ४ अभियंत्यांना मूळ विभागाचे काम सांभाळून या १४ गावांचे अतिरिक्त कामकाज पाहायचे आहे. भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळण, बाळे आणि दहिसर मोरी. दहिसर, निघू, मोकाशीपाडा, नावाळी, या गावांचा यामध्ये समावेश आहे. १४ गावांच्या मालमत्ता हस्तांतरणाच्या कामाला ११ तारखेपासून होणार आहे. दरम्यान, याबाबतचे आदेश निघताच फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या