Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

  96

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी


पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस (Mumbai rain) पडत होता. मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. आता हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होऊ लागली आहे. मात्र, अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यांतील खड्ड्यांनी एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. पालघरमध्ये रस्त्यातील खड्ड्यात एक दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकीवरील महिलेच्या हातातील दीड वर्षांचे बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच वेळी सर्वत्र हळहळ तर प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली. आई-वडिलांसोबत हा चिमुकला बाजारपेठेत जात असताना पावसाचे पाणी साचून तुडुंब भरलेल्या खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. खड्ड्यात पडताच आईच्या हातातून बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माहीर मोशीन शिवानी असं या चिमुकल्याचं नाव आहे.


या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.


मुसळधार पावसामुळे आज सकाळीच एक महिला धावत्या ट्रेनमधून पडल्याचे वृत्त समोर आले होते. या महिलेचा जीव वाचला परंतु तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले. पावसाच्या हाहाकाराने झालेल्या या दोन घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम