Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी


पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस (Mumbai rain) पडत होता. मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. आता हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होऊ लागली आहे. मात्र, अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यांतील खड्ड्यांनी एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. पालघरमध्ये रस्त्यातील खड्ड्यात एक दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकीवरील महिलेच्या हातातील दीड वर्षांचे बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच वेळी सर्वत्र हळहळ तर प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली. आई-वडिलांसोबत हा चिमुकला बाजारपेठेत जात असताना पावसाचे पाणी साचून तुडुंब भरलेल्या खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. खड्ड्यात पडताच आईच्या हातातून बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माहीर मोशीन शिवानी असं या चिमुकल्याचं नाव आहे.


या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.


मुसळधार पावसामुळे आज सकाळीच एक महिला धावत्या ट्रेनमधून पडल्याचे वृत्त समोर आले होते. या महिलेचा जीव वाचला परंतु तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले. पावसाच्या हाहाकाराने झालेल्या या दोन घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा