Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी


पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस (Mumbai rain) पडत होता. मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. आता हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होऊ लागली आहे. मात्र, अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यांतील खड्ड्यांनी एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. पालघरमध्ये रस्त्यातील खड्ड्यात एक दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकीवरील महिलेच्या हातातील दीड वर्षांचे बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच वेळी सर्वत्र हळहळ तर प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली. आई-वडिलांसोबत हा चिमुकला बाजारपेठेत जात असताना पावसाचे पाणी साचून तुडुंब भरलेल्या खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. खड्ड्यात पडताच आईच्या हातातून बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माहीर मोशीन शिवानी असं या चिमुकल्याचं नाव आहे.


या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.


मुसळधार पावसामुळे आज सकाळीच एक महिला धावत्या ट्रेनमधून पडल्याचे वृत्त समोर आले होते. या महिलेचा जीव वाचला परंतु तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले. पावसाच्या हाहाकाराने झालेल्या या दोन घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

राज्यात थंडी वाढणार! काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज

मुंबई: नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. १ जानेवारीला कोकणात

महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठीचीच सक्ती!

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : ‘महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्ती आहे’,

बस पेटल्याने समृद्धी महामार्गावर चालकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर वैजापूरहून, मुंबईहून येणाऱ्या दिशेच्या मार्गावर ट्रॅकची

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन मुलांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत आमदार शरद सोनावणे आणि

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डॉ. नरेंद्र जाधव यांच्या

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय, छत्रपती संभाजी महाराज समाधीसाठी अडीच एकर जमीन देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार मुंबई :