मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. पोयसर नदीचे पाणी दरवर्षी तुंबते. यामुळे नदीकाठच्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचते. यामुळे स्थानिक नागरिकांसह व्यापा-यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
पाण्याचा निचरा व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून पोयसर नदीच्या काठावर संरक्षण भिंत बांधली आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखिल मे महिन्यातच येथील शंकरपाडा परिसरात सक्शन पंप बसवून जय्यत तयारी केली होती. परंतु यावर्षी चांगला पाऊस झालाच नव्हता. आज रात्री मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे पहाटे चारच्या सुमारास पाणी साचण्यास सुरूवात झाली.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने येऊन सक्शन पंप सुरू केला. परंतू मागचा आणि पुढचा दोन्ही पाईप फुटल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. परंतू पहाटेची वेळ असल्याने पाईप कठून आणणार असे म्हणत त्यांनी तिथून पळ काढला… अखेर कांदिवली गाव, डहाणुकर वाडी, शंकरपाडा, लालजीपाडा, अभिलाख नगर, गांधी नगर या भागात पोयसर नदीकाठचे रस्ते देखिल दुथडी भरून वाहत होते. यात अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…