Mumbai Railway stations : मुंबईच्या रेल्वे स्थानकांबाबत आज विधानपरिषदेत होणार महत्त्वाचा ठराव!

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची (Mumbai Railway stations) नावे बदलण्याचा निर्णय चर्चेत आहे. या निर्णयासंबंधी आज विधानपरिषदेत चर्चा होणार आहे. मुंबईच्या पश्चिम, मध्य व हार्बर मार्गावरील (Western, Central and Harbour railway) काही ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलून त्यांना त्या परिसराला ओळखल्या जाणाऱ्या मराठी नावात बदलण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंबंधी ज्या रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत, त्यांची यादी समोर आली आहे.


पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात विधिमंडळात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर केली जाणार आहेत. आज विधानपरिषदेत कामकाज सुरू झाल्यानंतर सर्वात आधी नवनिर्वाचित शिक्षक आणि पदवीधरमधून निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या नामंतरणाबाबत करण्यात आलेल्या शासकीय ठरावही आज विधान परिषदेत ठेवला जाणार आहे.


मध्य रेल्वे मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
करीरोड : लालबाग रेल्वे स्थानक
सॅन्डहर्स्ट रोड : डोंगरी रेल्वे स्थानक


पश्चिम मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
मरीन लाईन रेल्वे स्थानक : मुंबादेवी रेल्वे स्थानक
चर्नीरोड रेल्वे स्थानक : गिरगांव रेल्वे स्थानक


हार्बर मार्गावरील कोणत्या स्थानकांची नावं बदलणार?
कॉटनग्रीन : काळाचौकी रेल्वे स्थानक
डॉकयार्ड : माझगांव रेल्वे स्थानक
किंग्ज सर्कल : तीर्थंकर पार्श्वनाथ स्थानक


त्यामुळे आजच्या विधानपरिषदेत स्थानकांच्या नावांबाबत नेमकं काय ठरवलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक