Hathras Stampede : दुर्घटनेनंतर भोलेबाबा पहिल्यांदाच माध्यमांसमोर; म्हणाला मृत परिवाराच्या लोकांना...

लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना अनेक प्रकार उघडकीस येत होते. अशातच फरार भोलेबाबा पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आला असून त्याने हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यासोबत हाथरस दुर्घटनेमधील मृत परिवाराच्या लोकांना मदत करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस प्रकरणातील भोलेबाबा दुर्घटना झाल्यापासून अज्ञातवासात असून या घटनेतील मुख्य आयोजक फरार होता. सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी दुर्घटनेतील मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याला अटक केली आहे. तर भोलेबाबानेही पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर येऊन आपली प्रतिक्रिया मांडली आहे.



काय म्हणाला भोलेबाबा?


मंगळवार २ जुलै रोजी घडलेल्या हाथरस प्रकरणात १२१ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी देखील झाले. याप्रकरणानंतर भोलेबाबांनी शोक व्यक्त केला. त्यासोबत सर्वांनी शासनावर विश्वास ठेवावा. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. मृत परिवाराच्या लोकांनाही मदत केली जाणार असल्याचे आश्वासन भोलेबाबांनी यावेळी दिले.



मुख्य आयोजकाला अटक


हाथरस दुर्घटनेतील प्रमुख आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. परंतु देवप्रकाशने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला

आधार कार्ड पुन्हा एकदा बदलणार

नाव असेल ना पत्ता, फोटोसोबत असेल क्युआर कोड नवी दिल्ली : सर्व आर्थिक व्यवहारांसाठी आधारकार्डशिवाय पर्याय नाही.

वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी १० पट जास्त शुल्क

ट्रकपासून बाईकपर्यंत २,५०० वरून थेट २५,००० रुपये नवी दिल्ली : केंद्र सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग

रशिया भारताला एसयू - ५७ लढाऊ विमाने देणार

मॉस्को : रशियाने भारताला एसयू-५७ स्टेल्थ लढाऊ विमाने पुरवण्यास सहमती दर्शवली आहे. रशियन कंपनी रोस्टेकचे सीईओ