Pune News : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठ्या पटीने वाढ

जाणून घ्या सध्याची टक्केवारी


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. पुण्यातील खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पातील चार धरणांमध्ये केवळ ३.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची (Water Shortage) टांगती तलवार होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार होता. परंतु अनेक दिवसांपासून पुण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. मात्र आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस पडला आहे. त्यामुळे या क्षेत्रात एकूण पाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच एकूण दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे समोर आले. यामुळे चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. सध्या धरण क्षेत्रात ४.९९ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे


राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पाणीसंकटाला सामोरे जावे लागले होते. परंतु यंदा पावसाने वेळेआधीच राज्यभरात चांगलीच हजेरी लावल्यामुळे पाणीकपातीच्या संकाटांना सामोरे जावे लागणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास