Pune News : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठ्या पटीने वाढ

  102

जाणून घ्या सध्याची टक्केवारी


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. पुण्यातील खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पातील चार धरणांमध्ये केवळ ३.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची (Water Shortage) टांगती तलवार होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार होता. परंतु अनेक दिवसांपासून पुण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. मात्र आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस पडला आहे. त्यामुळे या क्षेत्रात एकूण पाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच एकूण दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे समोर आले. यामुळे चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. सध्या धरण क्षेत्रात ४.९९ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे


राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पाणीसंकटाला सामोरे जावे लागले होते. परंतु यंदा पावसाने वेळेआधीच राज्यभरात चांगलीच हजेरी लावल्यामुळे पाणीकपातीच्या संकाटांना सामोरे जावे लागणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या