Pune News : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठ्या पटीने वाढ

जाणून घ्या सध्याची टक्केवारी


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या धरणात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. पुण्यातील खडकवासला (Khadakwasla) प्रकल्पातील चार धरणांमध्ये केवळ ३.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची (Water Shortage) टांगती तलवार होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार होता. परंतु अनेक दिवसांपासून पुण्यात पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती. मात्र आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस पडला आहे. त्यामुळे या क्षेत्रात एकूण पाच टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच एकूण दीड टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे समोर आले. यामुळे चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. सध्या धरण क्षेत्रात ४.९९ टीएमसी पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे


राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पाणीसंकटाला सामोरे जावे लागले होते. परंतु यंदा पावसाने वेळेआधीच राज्यभरात चांगलीच हजेरी लावल्यामुळे पाणीकपातीच्या संकाटांना सामोरे जावे लागणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला