NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी


मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास १३ दिवसांनी, राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा, पदव्युत्तर (NEET PG) च्या सुधारित परीक्षेची तारीख आज जाहीर झाली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) आता ११ ऑगस्ट रोजी NEET PG परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. NEET PG 2024 दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल.


नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या अनियमिततेच्या आरोपांमुळे NBEMSने सावधगिरीचा उपाय म्हणून २३ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली. देशभरात सुमारे ५२,००० पदव्युत्तर जागांसाठी दरवर्षी सुमारे दोन लाख एमबीबीएस पदवीधर NEET PG परीक्षा देतात. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा रद्द करण्यात आली कारण मंत्रालयाला परीक्षा प्रक्रियेची मजबूती तपासायची होती आणि प्रक्रियेत कोणतीही असुरक्षितता नाही याची खात्री करायची होती.


मिळालेल्या माहितीनुसार, परिक्षेसंदर्भात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्रालयाची महत्वाची बैठक झाली. नीट परीक्षा एनटी ऐवजी आता एनव्हीईमार्फत घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ३ तास आधी प्रश्नपत्रिका तयार होणार असल्याची माहिती मिळत आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने NEET PG च्या नवीन परीक्षेच्या तारखेची नोटीस जारी केली आहे. ही परीक्षा आता ११ ऑगस्ट २०१४ रोजी घेतली जाणार आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर