Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या 'या' विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय


मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता राज्यातील ईडब्ल्यूएस (EWS), एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) विद्यार्थिनींसाठी नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली आहे.


व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना यापूर्वी सरकारने ५० टक्के शिक्षण शुल्क मंजूरी देण्यात आली होती. परंतु आता या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के माफी देण्यात आली आहे. २०२४-२५ पासून ही योजना लागू होणार असून याचा फायदा राज्यातील २ लाखांहून अधिक मुलींना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थिनींच्या कुटुंबांचे प्रतिवर्ष उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे.


दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचा समावेश वाढवण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय मदत करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासोबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आणखी काही महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

श्रीवर्धन : राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसागणिक गंभीर होऊ लागली

अल्पवयीन मुलीचं शोषण करत धर्मांतरासाठी दबाव, भिवंडीतील संतापजनक प्रकार समोर

भिवंडी: सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि तिला आंतरधर्मीय

युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत, नाशिकमधील १२०० उद्योगांना फटका

मुंबई: इराण अमेरिका, इस्त्राईल युद्धाची झळ आता जगभरात बसताना दिसत आहे. आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या या

Buldhana Crime: जेवणातून विष द्यायचा प्रयत्न फसला; शेवट मास्टर प्लॅन आखला अन् वृषाली गावंडेचा...

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात एखाद्या चित्रपटालाही शोभेल असे कारस्थान

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीत वाढ; किती दिवसांनी दुसरा बुक करता येणार?

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतं

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत भीषण आग; स्फोटानंतर आगीचा भडका होताच कामगार धावले

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या स्फोटावरुन सातत्याने येथील सुरक्षेचा