Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या 'या' विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय


मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता राज्यातील ईडब्ल्यूएस (EWS), एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) विद्यार्थिनींसाठी नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली आहे.


व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना यापूर्वी सरकारने ५० टक्के शिक्षण शुल्क मंजूरी देण्यात आली होती. परंतु आता या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के माफी देण्यात आली आहे. २०२४-२५ पासून ही योजना लागू होणार असून याचा फायदा राज्यातील २ लाखांहून अधिक मुलींना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थिनींच्या कुटुंबांचे प्रतिवर्ष उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे.


दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचा समावेश वाढवण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय मदत करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासोबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आणखी काही महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या