Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या 'या' विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय


मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता राज्यातील ईडब्ल्यूएस (EWS), एसईबीसी (SEBC) आणि ओबीसी (OBC) विद्यार्थिनींसाठी नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली आहे.


व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना यापूर्वी सरकारने ५० टक्के शिक्षण शुल्क मंजूरी देण्यात आली होती. परंतु आता या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के माफी देण्यात आली आहे. २०२४-२५ पासून ही योजना लागू होणार असून याचा फायदा राज्यातील २ लाखांहून अधिक मुलींना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थिनींच्या कुटुंबांचे प्रतिवर्ष उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे.


दरम्यान, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये अधिकाधिक मुलींचा समावेश वाढवण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय मदत करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासोबत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना आणखी काही महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास