Virat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. काल मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथे विजयी भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी उसळलेला जनसागर पाहता याची प्रचिती आली. या शोभायात्रेनंतर वानखेडे स्टेडिअमवरही (Wankhede Stadium) अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशननंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) तडक लंडनला रवाना झाला आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.


विराट कोहलीचा देशभरातच नव्हे तर अख्ख्या जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या कामासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना प्रचंड रस आहे. पण विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम खाजगी ठेवायला आवडतं. त्यांच्या मुलांचे चेहरे देखील त्यांनी अद्याप मिडीयासमोर आणलेले नाहीत.


विराट कोहली नेहमीच आपल्या कामामधून जसा वेळ मिळेल तसं आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसतो. यावेळीही विजयी सेलिब्रेशननंतर तो तडक लंडनला निघाला याचं कारण म्हणजे विराटची पत्नी अनुष्का आणि त्याची दोन मुलं वामिका आणि अकाय लंडनमध्ये आहेत. याआधी विराटने दिल्लीमध्ये त्याची बहिण आणि भावासोबतही चांगला वेळ घालवला होता. यानंतर तो आता पत्नी व मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी लंडनला निघाला आहे.

Comments
Add Comment

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या