Virat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. काल मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथे विजयी भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी उसळलेला जनसागर पाहता याची प्रचिती आली. या शोभायात्रेनंतर वानखेडे स्टेडिअमवरही (Wankhede Stadium) अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशननंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) तडक लंडनला रवाना झाला आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.


विराट कोहलीचा देशभरातच नव्हे तर अख्ख्या जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या कामासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना प्रचंड रस आहे. पण विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम खाजगी ठेवायला आवडतं. त्यांच्या मुलांचे चेहरे देखील त्यांनी अद्याप मिडीयासमोर आणलेले नाहीत.


विराट कोहली नेहमीच आपल्या कामामधून जसा वेळ मिळेल तसं आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसतो. यावेळीही विजयी सेलिब्रेशननंतर तो तडक लंडनला निघाला याचं कारण म्हणजे विराटची पत्नी अनुष्का आणि त्याची दोन मुलं वामिका आणि अकाय लंडनमध्ये आहेत. याआधी विराटने दिल्लीमध्ये त्याची बहिण आणि भावासोबतही चांगला वेळ घालवला होता. यानंतर तो आता पत्नी व मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी लंडनला निघाला आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत