Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू


पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवताना दिसून येतात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही वाहनचालक कोणत्याही सूचनांचे पालन न करता सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. सध्या महाराष्ट्रात अपघाताचे सत्र वाढत असतानाच आज सकाळी मुंबई - पुणे एक्सप्रेसवर (Mumbai Pune Expressway) भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामध्ये तीन वाहने एकमेकांना जोरदार धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे एक्सप्रेसवर आज सकाळी सातच्या सुमारास महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनर वाहन, गॅस टँकर आणि गाडी एकमेकांना आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत मृताला खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अक्षय ढेले (३०) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला असून सध्या पोलिसांकडून त्याचा कडक शोध घेतला जात आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे