Accident News : भीषण अपघात! मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर तीन वाहनांची जोरदार धडक

तिन्ही गाड्यांचा चक्काचूर; एकाचा जागीच मृत्यू


पुणे : सध्या अनेक मार्गांवर मोकळा रस्ता दिसताच वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवताना दिसून येतात. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही वाहनचालक कोणत्याही सूचनांचे पालन न करता सुसाट वेगाने वाहने चालवत आहेत. सध्या महाराष्ट्रात अपघाताचे सत्र वाढत असतानाच आज सकाळी मुंबई - पुणे एक्सप्रेसवर (Mumbai Pune Expressway) भीषण अपघात (Accident) झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातामध्ये तीन वाहने एकमेकांना जोरदार धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - पुणे एक्सप्रेसवर आज सकाळी सातच्या सुमारास महामार्गावरील नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये कंटेनर वाहन, गॅस टँकर आणि गाडी एकमेकांना आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अन्य जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होत मृताला खोपोली येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, अपघातानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अक्षय ढेले (३०) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर कंटेनरचालक फरार झाला असून सध्या पोलिसांकडून त्याचा कडक शोध घेतला जात आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये