Smriti Biswas : मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत पडदा गाजवलेल्या स्मृती बिस्वास काळाच्या पडद्याआड!

  190

वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


मुंबई : वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून सुरुवात करत राज कपूर (Raj Kapoor) आणि देवानंद (Dev Anand) यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत पडदा गाजवलेल्या अभिनेत्री स्मृती बिस्वास नारंग (Smriti Biswas Narang) यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी नाशिक (Nashik) येथे आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. काल रात्री वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने सोशल मीडियावर त्यांचा फोटो पोस्ट करून त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.


ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं. स्मृती बिस्वास यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये १०० वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर वृद्धापकाळाने त्यांचं ३ जुलै रोजी निधन झालं. आज ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात राजीव आणि सत्यजीत ही दोन मुले आहेत.



कोण होत्या स्मृती बिस्वास?


अभिनेत्री स्मृती बिस्वास यांनी १९३० च्या दशकात फिल्मी कारकि‍र्दीला सुरुवात केली. वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. 'संध्या' या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज चित्रपट निर्मात्यांसोबत काम केलं, ज्यामध्ये गुरु दत्त, व्ही शांताराम, मृणाल सेन, बिमल रॉय, बीआर चोप्रा आणि राज कपूर यांचा समावेश आहे.


त्यांनी 'नेक दिल', 'अपराजिता' आणि 'मॉडर्न गर्ल' या हिट चित्रपटामध्येही काम केलं. १९३० ते १९६० पर्यंतच्या तीन दशकांमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि महत्त्वपूर्ण योगदान दिलं. बाप रे बाप, 'भागम भाग', 'द्वांड' 'नील आकाशेर नीचे' यांसारख्या चित्रपटांसाठी त्या ओळखल्या जातात.


चित्रपट निर्माते एसडी नारंग यांच्याशी लग्न केल्यानंतर स्मृती बिस्वास यांनी अभिनय सोडला होता. पतीच्या निधनानंतर त्या नाशिकला स्थलांतरित झाल्या. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी बिस्वास यांनी त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला.



हंसल मेहता यांनी वाहिली श्रद्धांजली


चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून स्मृती बिस्वास यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी स्मृती यांचे शेवटच्या दिवसांतील काही फोटोज शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, "प्रिय स्मृतीजी शांततेत आणि आनंदाच्या ठिकाणी जा. आमच्या जीवनाला आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद". स्मृती बिस्वास यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या