Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

Share

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर

मुंबई : समान पाणी वाटपाची योजना काही एका दिवसात झालेली नाही. तीला किमान ८ वर्षांचा कालावधी लागला. असे असले तरी पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय हे लक्षात आले असून आता पाण्याच्या एका एका थेंबाचा हिशोब घेणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पाणी योजनेवर सविस्तर माहीती दिली. याबाबत कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले.

पुण्यात ७२ लाख लोकसंख्या सरकारने गृहित धरली आहे. शहरी भागात प्रतिमाणूस १५० लिटर आपण पाणी देतो. राज्यातील सर्व शहरांसाठी हा निकष आहे. दरम्यान, पुण्यात ११.६० टीएमसी पाण्याची तरतूद आहे. परंतु, तरतुदीच्या विरुद्ध जाऊन १४.६१ टीएमसीला मंजूरी देण्यात आलेली आहे. म्हणजे, तरतुदीपेक्षा ३ टक्के जास्त मंजूरी देण्यात आलेली आहे. दरम्यान, त्यामध्ये सर्वत्र मिळून शहराचा वापर आहे २०.७८ टीएमसी. म्हणजे तरतुदीच्या दुप्पट पुणे शहराला पाण्याचा वापर होत आहे, अशी सविस्तर माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, तरतुदीनुसार पुण्याला सध्या पाणी पाहिजे १२.८२ टीएमसी इतकं. परंतु, आज पुणे २०.७८ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. म्हणजेच, मोठ्या प्रमाणात गळती आहे. विनानोंद पद्धतीने पाणी वाटप होत आहे. या सगळ्याची दखल घेऊन हे पाणी वाटप व्हायला हवे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, पाण्याच्या एका एका थेंबाचा हिशोब व्हायला हवा असेही ते यावेळी म्हणाले. त्याचवेळी यामध्ये सुमारे ४० टक्के गळती आहे. ती २० टक्क्यांवर आणण्याचे काम सुरू असून लवकरच यामध्ये सुधारणा होईल असेही फडणवीसांनी यावेळी बोलताना सांगितले.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

18 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

46 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago