Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले 'रास्ता रोको' आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी


छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरावर दोन दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे (Drone) टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नजर ठेवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रकारामुळे मनोज जरांगे यांच्यावर धोक्याचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) द्यावी अशी मागणी सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र सतत मागणी करुनही प्रशासन कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे मराठा बांधवांनी (Maratha Protesters) आक्रमक भूमिका धारण केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरमधील मराठा बांधव आक्रमक झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आला आहे. मात्र या आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


दरम्यान, अंतरवालीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याबाबत सरपंच पांडुरंग तारख यांनी माहिती देत जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती. तसे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. काल पांडुरंग तारख यांनी मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे