तुम्ही Jio युजर्स आहात का? तर हे जरूर वाचा

मुंबई: रिलायन्स जिओने(reliance jio) आपल्या प्लानचे दर बदलले आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. येथे लोकांना रिचार्ज प्लानची वाढलेली किंमत पाहून नक्कीच धक्का बसू शकतो. यासोबतच एक गोष्ट समोर आली आहे ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसू शकतो. जिओने नव्या प्लानची यादी जाहीर केली आहे. यात स्पष्टपणे म्हटले आहे की जिओच्या काही प्रीपेड प्लानसोहत अनलिमिटेड ५जी फायदा होणार नाही.


रिलायन्स जिओ केवळ त्याच प्रीपेड प्लानवर अनलिमिटेड ५ जी डेटा देणार आहे जे दर दिवशी २ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा अधिक डेटा वापरतात. याचाच अर्थ दर दिवशी १.५ जीबी डेटा अथवा त्यापेक्षा कमी डेटाच्या प्लानमध्ये ५ जी इंटरनेट डेटाची सुविधा मिळणार नाही.



२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लान ज्यात ५ जी डेटा मिळतो


३४९ रूपयांचा प्लान - आधी याची किंमत २९९ रूपये होती आता यासाठी ३४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


३९९ रूपयांचा प्लान - आधी या प्लानची किंमत ३४९ रूपये होती त्यासाठी आता ३९९ रूपये द्यावे लागतील. यात दर दिवसाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतात.


४४९ रूपयांचा प्लान - याआधी या प्लानची किंमत ३९९ रूपये होती आता त्यासाठी ४४९ रूपये खर्च करावे लागतील. यात दर दिवसाला ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस मिळतो.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील

Minister Shivendrasinhraje Bhosale : रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती मुंबई : राज्यातील नागरिकांना

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा

ऑनलाईन गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स गल्लत नको! महाराष्ट्र शासन लवकरच आणणार स्वतंत्र धोरण

मुंबई : महाराष्ट्र शासन राज्यातील वाढत्या ई-स्पोर्ट्स (E-Sports) क्षेत्रासाठी एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण आणणार