आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

  577

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५ टक्के अधिक खर्च करावे लागतील. कंपनीच्या नव्या प्लानच्या किंमतींची घोषणा गेल्या आठवड्यात कऱण्यात आली होती. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत.


जर तुम्हीही जिओ युजर्स आहात तर जुन्या किंमतीच्या तुलनेत नव्या प्लानच्या किंमतीत किती अंतर आहे हे जाणून घेऊया...



महिन्याच्या प्लानचे इतके वाढले दर


१५५ रूपयांच्या प्लानची किंमत वाढून १८९ रूपये झाली आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या २०९ प्लानची किंमत वाढून आता २४९ रूपये झाली आहे. यात दिवसाला १ जीबी डेटा मिळतो.


२३९ रूपयाच्या प्लानची किंमत वाढून २९९ रूपये करण्यात आली आहे. २९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३४९ रूपये करण्यात आली आहे. ३४९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून ३९९ रूपये करण्यात आली आहे. तर ३९९ रूपयांच्या प्लानची किंमत ४४९ रूपये करण्यात आली आहे. या सर्व प्लान्सची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.



२ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


४७९ रूपयांच्या प्लानची किंमत ५७९ रूपये झाली आहे. यात १.५ जीबी डेटा मिळतो. ५३३ रूपयांच्या प्लानची किंमत ६२९ रूपये झाली आहे. यात २ जीबी डेटा मिळतो.



३ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लानची आधीची किंमत ३९५ रूपये होती. याची किंमत आता वाढून ४७९ इतकी झाली आहे. यात ६ जीबी डेटा मिळतो.



वार्षिक प्लानमध्ये किती झाली वाढ?


१५५९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून १८९९ रूपये झाली आहे. यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. २९९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३५९९ रूपये करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

'समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत'

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला इशारा मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा संदर्भातील दोन जीआर रद्द केले आहेत.

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास, विद्यार्थी हितासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती - मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर मुंबई : राज्यात सर्व

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिकांचा रंग हवा पांढरा

अन्य रंगांच्या पत्रिका असल्यास त्वरीत बदलाव्या लागणार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यरत कर्मचारी

पाच तारखेचा मोर्चा निघणार नाही, सर्वपक्षीय नेत्यांचा निर्णय

मुंबई : मागील सरकारमध्ये उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हिंदी भाषा सक्तीकरणाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे

कुठल्या तोंडाने आंदोलन करता, शासनाचे दोन्ही जीआर रद्द; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्यात हिंदी भाषेला विरुध्द करण्यासाठी राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर

मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागणार

मुंबई :मुंबई डबेवाल्यांच्या सेवा दरात आता वाढ होणार आहे . याबद्दलची सविस्तर माहिती मुंबई डबेवाला असोसिएशन ने