आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५ टक्के अधिक खर्च करावे लागतील. कंपनीच्या नव्या प्लानच्या किंमतींची घोषणा गेल्या आठवड्यात कऱण्यात आली होती. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत.


जर तुम्हीही जिओ युजर्स आहात तर जुन्या किंमतीच्या तुलनेत नव्या प्लानच्या किंमतीत किती अंतर आहे हे जाणून घेऊया...



महिन्याच्या प्लानचे इतके वाढले दर


१५५ रूपयांच्या प्लानची किंमत वाढून १८९ रूपये झाली आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या २०९ प्लानची किंमत वाढून आता २४९ रूपये झाली आहे. यात दिवसाला १ जीबी डेटा मिळतो.


२३९ रूपयाच्या प्लानची किंमत वाढून २९९ रूपये करण्यात आली आहे. २९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३४९ रूपये करण्यात आली आहे. ३४९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून ३९९ रूपये करण्यात आली आहे. तर ३९९ रूपयांच्या प्लानची किंमत ४४९ रूपये करण्यात आली आहे. या सर्व प्लान्सची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.



२ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


४७९ रूपयांच्या प्लानची किंमत ५७९ रूपये झाली आहे. यात १.५ जीबी डेटा मिळतो. ५३३ रूपयांच्या प्लानची किंमत ६२९ रूपये झाली आहे. यात २ जीबी डेटा मिळतो.



३ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लानची आधीची किंमत ३९५ रूपये होती. याची किंमत आता वाढून ४७९ इतकी झाली आहे. यात ६ जीबी डेटा मिळतो.



वार्षिक प्लानमध्ये किती झाली वाढ?


१५५९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून १८९९ रूपये झाली आहे. यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. २९९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३५९९ रूपये करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

ठाणे, पुणे नागपूरसह ११ जिल्ह्यांत होणार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये

प्रशासकीय भार हलका करण्यासाठी निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील वाढती

विधान परिषदेचा अवमान करणार्‍या शरद पवार गटाच्या पदाधिकार्‍याला शिक्षा ?

पदाधिकार्‍याला ३० दिवसांच्या कारावासाची शिफारस घटनात्मक पदांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले;

विधिमंडळातील चर्चांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

विधानसभा अध्यक्षांनी घेतली गंभीर दखल; कठोर कारवाईचा दिला इशारा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पासारख्या अतिशय

आता महिनाभरात होणार जमीन मोजणी - राज्यात २०० 'खासगी भूमापकांची' नियुक्ती; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी महसूल

आखाती देशांमध्ये अडकलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेबाबत विधानपरिषदेत चर्चा

महाराष्ट्र विधानपरिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आखाती (Gulf) देशांमध्ये निर्माण

प्रवेशमार्गांवर घडणार मुंबईची ओळख

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक  संकल्पनांवर आधारित असेल प्रवेशद्वार महापौरांनी तिन्ही प्रवेशमार्गांची केली