आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

  582

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५ टक्के अधिक खर्च करावे लागतील. कंपनीच्या नव्या प्लानच्या किंमतींची घोषणा गेल्या आठवड्यात कऱण्यात आली होती. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत.


जर तुम्हीही जिओ युजर्स आहात तर जुन्या किंमतीच्या तुलनेत नव्या प्लानच्या किंमतीत किती अंतर आहे हे जाणून घेऊया...



महिन्याच्या प्लानचे इतके वाढले दर


१५५ रूपयांच्या प्लानची किंमत वाढून १८९ रूपये झाली आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या २०९ प्लानची किंमत वाढून आता २४९ रूपये झाली आहे. यात दिवसाला १ जीबी डेटा मिळतो.


२३९ रूपयाच्या प्लानची किंमत वाढून २९९ रूपये करण्यात आली आहे. २९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३४९ रूपये करण्यात आली आहे. ३४९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून ३९९ रूपये करण्यात आली आहे. तर ३९९ रूपयांच्या प्लानची किंमत ४४९ रूपये करण्यात आली आहे. या सर्व प्लान्सची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.



२ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


४७९ रूपयांच्या प्लानची किंमत ५७९ रूपये झाली आहे. यात १.५ जीबी डेटा मिळतो. ५३३ रूपयांच्या प्लानची किंमत ६२९ रूपये झाली आहे. यात २ जीबी डेटा मिळतो.



३ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लानची आधीची किंमत ३९५ रूपये होती. याची किंमत आता वाढून ४७९ इतकी झाली आहे. यात ६ जीबी डेटा मिळतो.



वार्षिक प्लानमध्ये किती झाली वाढ?


१५५९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून १८९९ रूपये झाली आहे. यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. २९९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३५९९ रूपये करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले

अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीए आणणार नियंत्रण

अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई : नागरी विकासात शिस्तबद्धता आणि कायदेशीरतेला चालना

आशिष शर्मा यांच्याकडेच बेस्टची जबाबदारी

मुंबई : आर्थिक डबघाईस आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यावर

उबाठाचे १० ते १५ माजी नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, महिन्याभरात होणार प्रवेश

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा सेनेला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या

बेस्ट तोट्यात जाण्यास तत्कालीन सत्ताधारी उबाठा शिवसेनाच जबाबदार, काँग्रेसचा घरचा आहेर!

काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांचा आरोप भाडेतत्वावरील खासगी बसेस बंद करा मुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च