आजपासून महाग Jioचे सर्व प्लान, ग्राहकांना द्यावे लागणार इतके पैसे

मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५ टक्के अधिक खर्च करावे लागतील. कंपनीच्या नव्या प्लानच्या किंमतींची घोषणा गेल्या आठवड्यात कऱण्यात आली होती. आजपासून हे नवे दर लागू होत आहेत.


जर तुम्हीही जिओ युजर्स आहात तर जुन्या किंमतीच्या तुलनेत नव्या प्लानच्या किंमतीत किती अंतर आहे हे जाणून घेऊया...



महिन्याच्या प्लानचे इतके वाढले दर


१५५ रूपयांच्या प्लानची किंमत वाढून १८९ रूपये झाली आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा दिला जातो. जिओच्या २०९ प्लानची किंमत वाढून आता २४९ रूपये झाली आहे. यात दिवसाला १ जीबी डेटा मिळतो.


२३९ रूपयाच्या प्लानची किंमत वाढून २९९ रूपये करण्यात आली आहे. २९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३४९ रूपये करण्यात आली आहे. ३४९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून ३९९ रूपये करण्यात आली आहे. तर ३९९ रूपयांच्या प्लानची किंमत ४४९ रूपये करण्यात आली आहे. या सर्व प्लान्सची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे.



२ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


४७९ रूपयांच्या प्लानची किंमत ५७९ रूपये झाली आहे. यात १.५ जीबी डेटा मिळतो. ५३३ रूपयांच्या प्लानची किंमत ६२९ रूपये झाली आहे. यात २ जीबी डेटा मिळतो.



३ महिन्यांच्या प्लानची नवी किंमत


जिओच्या ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या या प्लानची आधीची किंमत ३९५ रूपये होती. याची किंमत आता वाढून ४७९ इतकी झाली आहे. यात ६ जीबी डेटा मिळतो.



वार्षिक प्लानमध्ये किती झाली वाढ?


१५५९ रूपयांच्या प्लानची किंमत वाढवून १८९९ रूपये झाली आहे. यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. २९९९ रूपयांच्या प्लानची किंमत ३५९९ रूपये करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस