Pune News : पुणेकरांवर पाणीबाणी! दुरुस्तीच्या कामांसाठी 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद

पुणे : जुलै महिन्याला सुरुवात झाली असून पावसाने (Maharashtra Rain) राज्यभरात चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे (Heat) अनेक शहरांना पाणीबाणीच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागले होते. मात्र आता ऐन पावसाळ्यातही अनेक जिल्ह्यांवर पाणीकपातीचे (Water Shortage) संकट सुरुच असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच महापालिकेकडून पावसाळी कामे हाती घेण्यात येतात. अशाच काही दुरुस्तीच्या कामांसाठी पुणेकरांना (Pune Water Shortage) आता पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. पुण्यात एक दिवसासाठी पाणी येणार नसल्याने पुणेकरांना पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे येत्या गुरुवारी काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यासोबत शुक्रवारी देखील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवा असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.



या भागात होणार दुरुस्तीचे काम


पुण्यातील खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.) जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर व भामा आसखेड जॅक्वेल येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.



'या' भागात पाणीपुरवठा बंद


पुण्यातील पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता शहराच्या बहुतांश सर्व भागातील पाणी पुरवठा गुरुवारी राहणार बंद राहणार आहे. त्यामुळे या परिसराच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना