Chhatrapati Sambhajinagar News : विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ!

  136

शाळेची दुरावस्था पाहून पालकांचा तीव्र संताप


छत्रपती संभाजीनगर : सध्या अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात (Nutritious Food) किडे, अळ्या, लेंड्या सापडत आहेत. अशा प्रकारचा पोषण आहार देऊन सरकार (Maharashtra Government) मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. सातत्याने पोषण आहारासंबंधी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येताना आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील शाळेची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेची परिस्थिती डबघाईला आली असल्यामुळे विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असणाऱ्या गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरावस्था झाली असून येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून इंग्रजी व २ वर्षांपासून गणित विषयासाठी याठिकाणी शिक्षकच नसल्याने पालक अन् विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.



शाळेची परिस्थिती डबघाईची


खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या शाळेत गल्लेबोरगाव सह आसपासच्या ८ ते १० गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या शाळेतील खोल्यांना तडे गेले तर काही खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आले आहेत. शाळेतील खोल्यांची पावसाळ्यात गळती होत असून हे छत केव्हाही कोसळू शकेल. अशा धोक्याच्या वातावरणात जवळपास ५९६ विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या दयनीय अवस्थेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आता पालक वर्गही चिंतेत पडला आहे.


दरम्यान, कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर्दम्य परिस्थिती पाहता या सगळ्या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देऊन याची गांभीर्याने दखल घेणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून