Chhatrapati Sambhajinagar News : विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ!

शाळेची दुरावस्था पाहून पालकांचा तीव्र संताप


छत्रपती संभाजीनगर : सध्या अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात (Nutritious Food) किडे, अळ्या, लेंड्या सापडत आहेत. अशा प्रकारचा पोषण आहार देऊन सरकार (Maharashtra Government) मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. सातत्याने पोषण आहारासंबंधी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येताना आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील शाळेची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेची परिस्थिती डबघाईला आली असल्यामुळे विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असणाऱ्या गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरावस्था झाली असून येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या ४ वर्षांपासून इंग्रजी व २ वर्षांपासून गणित विषयासाठी याठिकाणी शिक्षकच नसल्याने पालक अन् विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.



शाळेची परिस्थिती डबघाईची


खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या इयत्ता ५वी ते १०वी पर्यंतच्या शाळेत गल्लेबोरगाव सह आसपासच्या ८ ते १० गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या शाळेतील खोल्यांना तडे गेले तर काही खिडक्या आणि दरवाजे मोडकळीस आले आहेत. शाळेतील खोल्यांची पावसाळ्यात गळती होत असून हे छत केव्हाही कोसळू शकेल. अशा धोक्याच्या वातावरणात जवळपास ५९६ विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या दयनीय अवस्थेकडे जिल्हा परिषद प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह आता पालक वर्गही चिंतेत पडला आहे.


दरम्यान, कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुर्दम्य परिस्थिती पाहता या सगळ्या प्रकाराकडे प्रशासन लक्ष देऊन याची गांभीर्याने दखल घेणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे