Acharya Marathe College : विद्यार्थ्यांनो महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास जीन्स - टी शर्ट विसरा!

  57

मुंबईतल्या 'या' प्रसिद्ध कॉलेजचा नवा नियम


मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील एन.जी आचार्य मराठे कॉलेजने (Acharya Marathe College) हिजाब, बुरखा, नकाब, टोपी (Hijab Ban) यावर बंदी घातली होती. त्यानिर्णयानंतर कॉलेज चर्चेत आले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना कॉलेज मॅनेजमेंटने पुन्हा नवा नियम जारी केला आहे. आचार्य मराठे कॉलेजच्या अशा वेगळ्या निर्णयामुळे कॉलेजला पुन्हा एकदा चर्चेचे स्वरुप आले आहे. यामुळे कॉलेजच्या मॅनेजमेंटवर चहुबाजूने टिका होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कॉलेजमध्ये जाताना बहुतेक तरुण-तरूणी स्टायलिश कपडे घालून जातात. त्यावर आचार्य कॉलेजने आक्षेप घातला आहे. या संदर्भात कॉलेज व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापत्र जारी केले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रतिज्ञापत्राचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किंवा टी शर्ट घालून येता येणार नाही.



कॉलेजच्या नोटिसमध्ये काय म्हटले?


विद्यार्थ्यांनी औपचारिक आणि सभ्य कपडे घालावेत असे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या पोशाखातून धर्माचे प्रदर्शन होईल किवा सांस्कृतिक विषमता दाखवेल असे कपडे घालता येणार नाहीत, असे कॉलेजने स्पष्ट केले आहे. तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये जीन्स टी शर्ट, उघड कपडे आणि जर्सी घालण्यास मज्जाव करण्यात आल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात कॉलेजमध्ये बुरखा किवा हिजाब टोपी घालून येता येणार नाही असे म्हटले होते. त्याच आधारे कॉलेज व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा