Acharya Marathe College : विद्यार्थ्यांनो महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास जीन्स - टी शर्ट विसरा!

  63

मुंबईतल्या 'या' प्रसिद्ध कॉलेजचा नवा नियम


मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील चेंबूर (Chembur) येथील एन.जी आचार्य मराठे कॉलेजने (Acharya Marathe College) हिजाब, बुरखा, नकाब, टोपी (Hijab Ban) यावर बंदी घातली होती. त्यानिर्णयानंतर कॉलेज चर्चेत आले होते. हे प्रकरण ज्वलंत असताना कॉलेज मॅनेजमेंटने पुन्हा नवा नियम जारी केला आहे. आचार्य मराठे कॉलेजच्या अशा वेगळ्या निर्णयामुळे कॉलेजला पुन्हा एकदा चर्चेचे स्वरुप आले आहे. यामुळे कॉलेजच्या मॅनेजमेंटवर चहुबाजूने टिका होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कॉलेजमध्ये जाताना बहुतेक तरुण-तरूणी स्टायलिश कपडे घालून जातात. त्यावर आचार्य कॉलेजने आक्षेप घातला आहे. या संदर्भात कॉलेज व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञापत्र जारी केले आहे. महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रतिज्ञापत्राचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना यापुढे कॉलेजमध्ये येताना जीन्स किंवा टी शर्ट घालून येता येणार नाही.



कॉलेजच्या नोटिसमध्ये काय म्हटले?


विद्यार्थ्यांनी औपचारिक आणि सभ्य कपडे घालावेत असे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या पोशाखातून धर्माचे प्रदर्शन होईल किवा सांस्कृतिक विषमता दाखवेल असे कपडे घालता येणार नाहीत, असे कॉलेजने स्पष्ट केले आहे. तसेच कॉलेज कॅम्पसमध्ये जीन्स टी शर्ट, उघड कपडे आणि जर्सी घालण्यास मज्जाव करण्यात आल्याचे नोटिसमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात कॉलेजमध्ये बुरखा किवा हिजाब टोपी घालून येता येणार नाही असे म्हटले होते. त्याच आधारे कॉलेज व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत