Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला...

  490

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार


पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत अशाच पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल लोणावळ्यातील भुशी डॅमच्या (Lonawala Bhushi Dam) मागच्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनाकरता आलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच त्यातील एका मृतदेहाचा अद्याप शोधही लागलेला नसताना ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) आणखी एक तरुण वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. पर्यटनाकरता आलेल्या एका तरुणाने स्टंटबाजीच्या नादात आपला जीव गमावल्याने खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव असून एकूण ३२ जणांच्या आपल्या जिमच्या ग्रुपसोबत तो ताम्हिणी घाटात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आला होता. धबधब्यात पाण्याचा प्रवाह वेगाने असतानाही या तरुणांची मस्ती सुरु होती. त्यातच स्वप्नीलने धाडस म्हणून उंचावरुन पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्वतःला वाचवू शकला नाही. त्याने पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवाह इतका जोरात होता की तो वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





काहीच दिवसांपूर्वी रील्सच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात टाकत असल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. ताम्हिणी घाटातही धाडस दाखवण्याच्या नादातच स्वप्नीलला आपला जीव गमवावा लागला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, रोहा-रायगड रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. अद्याप त्याचा शोध घेतला जात आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या