Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

  144

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच


पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील अंगणवाडीतील (Anganvadi) लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात (Nutrition food) अळ्या आणि उंदराच्या लेंड्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील जनता वसाहतीमध्ये (Janta Vasahat) हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचा पोषण आहार देऊन सरकार (Maharashtra Government) मुलांच्या जीवाळी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.


पुण्यातल्या जनता वसाहतमधील पान आळीमध्ये एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडीमधील मुलांना देण्यात येणाऱ्या कडधान्यात अळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्या. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळे यांनी हा सर्वप्रकार उघडकीस आणला. एकात्मिक बाल योजना ही महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत येते. वाटप करणाऱ्या प्रशासकीय अधिकारीने पाकीट फोडल्यानंतर पहिल्याच पाकिटात अळया आणि उंदरांच्या लेंड्या आढळून आल्या.


शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवण्यात येणाऱ्या आहारातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पोषण आहारामध्ये आळ्या आणि उंदरांच्या लेंड्या आढळल्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


दरम्यान, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या धान्याला किड लागल्याचा प्रकार २५ जूनला समोर आला होता. खेड तालुक्यातील बहुळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता. शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदूळ, मटकी, मूगडाळ यांना किडे आणि आळ्या लागल्याचे समोर आले होते. स्थानिक ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर पुन्हा आता अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत