Akola News : धक्कादायक! कुलरचा शॉक लागून चिमुकल्यांचा मृत्यू

विजेचा झटक्याने ६जणांनी गमावला जीव


अकोला : राज्यभरात पावसाची (Maharashtra Rain) हजेरी लागली असली तरीही अनेक ठिकाणी उष्णतेचा पारा (Heat) देखील चढताना दिसून येत आहे. यामुळे घरात गारवा निर्माण करण्यासाठी अनेकांना एसी (AC) व कुलरची (Cooler) मदत घ्यावी लागत आहे. मात्र हाच कुलर जीवघेणा बनत आहे. अकोल्यात कुलरचा शॉक लागून चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. अकोल्यामध्ये आतापर्यंत कुलरमुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या आठवड्याभरात ३ चिमुकल्यांचा कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अकोल्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पिंजर येथे कुलरचा शॉक लागून ३ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. विरांश रवी राजगुरे असे या चिमुकल्याचे नाव आहे. विरांश हा घरात खेळत होता. खेळता खेळता तो कुलरजवळ गेला. मात्र आचानक त्याला विजेचा झटका लागला. त्याच्या पोटाला दुखापत झाली होती. तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



दोन मावस बहिणींचा शॉक लागून मृत्यू


सात दिवसांपूर्वी अकोल्यातल्या अकोट शहरातल्या काळेगावात दोन मावस बहिणींचा कुलरचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला होता. ४ वर्षांची ईशानी प्रवीण ढोले आणि ५ वर्षांची प्रियांशी सोपान मेतकर असे कुलरचा शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलींची नावे होती. या दोन्ही मुली काळेगाव येथे मामाकडे आल्या होत्या. खेळत असताना कुलरला त्यांचा हात लागला आणि त्यांना जोराचा विजेचा शॉक लागला. या घटनेत दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला.



विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू


अकोल्यामध्ये काही दिवसांपूर्वी कुलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून पोलिस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या घटनेत अकोला शहरातील युक्ती अमोल गोगे (७ वर्षे) या मुलीचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर मळसूर गावातील नितीन गजानन वानखडे (३८) या व्यक्तीला देखील कूलर चालू करताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये