मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून अनेकांच्या आयुष्यातील प्रश्न सर्रास सोडवले जात आहे. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा फोन बनला आहे. अनेकदा फोनमध्ये नवीन अपडेट येत असतात. अशातच सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच ‘एआय’ (AI) ची चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि मेटा एआयवर उपलब्ध झाला आहे. यामुळे प्रत्येकाला आता कोणत्याही विषयाबाबत सखोल माहिती मिळवण्यासाठी सोयीचे साधन असणार आहे. मात्र याच एआयबाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. हाय एआय तुमच्या मोबाईलमधला गुप्तहेर (AI Threat) बनला आहे. त्यामुळे मोबाईलमधला सर्व डेटा धोक्यात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एआयकडून मिळालेल्या सर्व सुविधा आकर्षक असल्या तरी त्यांची किंमत म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा आहे. कंपन्यांना एआयला सर्वोत्कृष्ट साधन बनवण्याच्या मोहात त्याला लागणाऱ्या माहितीसाठी क्लाउडचा वापर करतात. मात्र एकदा तुमची माहिती क्लाउडवर गेली की ती सुरक्षित राहण्याची शाश्वती नसते. यामुळे कोणतीही कंपनी, कर्मचारी, सरकारी संस्था किंवा हॅकर्स हा डेटा सहज पाहू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले.
दरम्यान, अनेक कंपन्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आपला डाटा गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे वापरकर्त्यांचा डाटा हा फार कमी सुरक्षित असतो. त्यामुळे कंपन्यांनी वापरकर्ताच्या गोपनीयतेची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…