AI Threat : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या मोबाईलमधला एआय आहे मोठा गुप्तहेर

  53

तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा


मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून अनेकांच्या आयुष्यातील प्रश्न सर्रास सोडवले जात आहे. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा फोन बनला आहे. अनेकदा फोनमध्ये नवीन अपडेट येत असतात. अशातच सध्या सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच 'एआय' (AI) ची चर्चा सुरु आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि मेटा एआयवर उपलब्ध झाला आहे. यामुळे प्रत्येकाला आता कोणत्याही विषयाबाबत सखोल माहिती मिळवण्यासाठी सोयीचे साधन असणार आहे. मात्र याच एआयबाबत तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. हाय एआय तुमच्या मोबाईलमधला गुप्तहेर (AI Threat) बनला आहे. त्यामुळे मोबाईलमधला सर्व डेटा धोक्यात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एआयकडून मिळालेल्या सर्व सुविधा आकर्षक असल्या तरी त्यांची किंमत म्हणजे तुमचा वैयक्तिक डेटा आहे. कंपन्यांना एआयला सर्वोत्कृष्ट साधन बनवण्याच्या मोहात त्याला लागणाऱ्या माहितीसाठी क्लाउडचा वापर करतात. मात्र एकदा तुमची माहिती क्लाउडवर गेली की ती सुरक्षित राहण्याची शाश्वती नसते. यामुळे कोणतीही कंपनी, कर्मचारी, सरकारी संस्था किंवा हॅकर्स हा डेटा सहज पाहू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले.


दरम्यान, अनेक कंपन्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आपला डाटा गोळा करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे वापरकर्त्यांचा डाटा हा फार कमी सुरक्षित असतो. त्यामुळे कंपन्यांनी वापरकर्ताच्या गोपनीयतेची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )