Recharge Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! जिओ, एअरटेल नंतर VIकडूनही मोठी दरवाढ

जाणून घ्या काय आहे नवीन रिचार्ज प्लॅन


मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला होता. मात्र वोडाफोन (Vodafone) आणि आयडियाकडून (Idea) रिजार्ज प्लॅनमध्ये कोणतेही बदल केले नसल्यामुळे या कंपनीच्या वापरकर्त्यांचे सुगीचे दिवस चालू होते. परंतु आता महागाईने सामान्यांना तिन्ही बाजूंनी घेरले असल्याचे चित्र दिसून येत आहे.


वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा (VI Tariff Hike) निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही प्लॅन्ससाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने प्लान्समध्ये १०-२१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे सामान्यांना आता रिचार्ज करणे महाग होणार आहे.



असे असतील रिचार्ज प्लान


४५९ रुपयांचा ८४ दिवसांची वैधता असलेला प्लॅन ५०९ रुपयांचा झाला आहे. ३६५ दिवसांसाठी १७९९ रुपयांचा प्लॅन १९९९ रुपयांचा झाला. २६९ ​​आणि २९९ रुपयांचा २८ दिवसांचा प्लॅन अनुक्रमे २९९ आणि ३४९ रुपयांचा झाला आहे. ३१९ रुपयांचा १ महिन्याचा प्लॅन ३७९ रुपयांचा झाला आहे. डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, १९ रुपयांचा प्लॅन २२ रुपयांचा आणि ३९ रुपयांचा प्लॅन ४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची ​​वैधता १ आणि ३ दिवसांची आहे. तर अनलिमिटेड कॉल प्लानबद्दल बोलायचे झाल्यास २८ दिवसांसाठी १७९ रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी आता १९९ रुपये मोजावे लागणार आहेत.



पोस्ट-पेड प्लानचे रिचार्ज 


पोस्ट-पेड प्लॅनमध्ये ४०१,५०१ रुपयांचे Indivisual Monthly Rental आता ४५१,५५१ रुपये झाले आहे. Family Plan Recharge ६०१, १००१ रुपयांवरून ७०१, १२०१ रुपयांपर्यंत वाढला आहे.



जिओ आणि एअरटेलचे काय आहेत दर?



  • एअरटेलने टॅरिफमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. नवीन प्लाननुसार, आता १७९चा प्लान १९९ रुपयांत मिळणार आहे. प्रीपेड दर दररोज सरासरी ७० पैशांनी वाढले आहेत. पोस्टपेड योजना १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता ४४९ रुपयांना मिळणार आहे. हे वाढलेले दर ३ जुलैपासून लागू होतील.

  • रिलायन्स जिओनेही रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. बुधवारी कंपनीने, याबाबत माहिती दिली आहे. जिओकडून सांगण्यात आले की, ३ जुलैपासून रिचार्ज प्लॅन १५ ते २५ टक्क्यांनी महाग होणार आहेत.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.