Recharge Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! जिओ, एअरटेल नंतर VIकडूनही मोठी दरवाढ

जाणून घ्या काय आहे नवीन रिचार्ज प्लॅन


मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला होता. मात्र वोडाफोन (Vodafone) आणि आयडियाकडून (Idea) रिजार्ज प्लॅनमध्ये कोणतेही बदल केले नसल्यामुळे या कंपनीच्या वापरकर्त्यांचे सुगीचे दिवस चालू होते. परंतु आता महागाईने सामान्यांना तिन्ही बाजूंनी घेरले असल्याचे चित्र दिसून येत आहे.


वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा (VI Tariff Hike) निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही प्लॅन्ससाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने प्लान्समध्ये १०-२१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे सामान्यांना आता रिचार्ज करणे महाग होणार आहे.



असे असतील रिचार्ज प्लान


४५९ रुपयांचा ८४ दिवसांची वैधता असलेला प्लॅन ५०९ रुपयांचा झाला आहे. ३६५ दिवसांसाठी १७९९ रुपयांचा प्लॅन १९९९ रुपयांचा झाला. २६९ ​​आणि २९९ रुपयांचा २८ दिवसांचा प्लॅन अनुक्रमे २९९ आणि ३४९ रुपयांचा झाला आहे. ३१९ रुपयांचा १ महिन्याचा प्लॅन ३७९ रुपयांचा झाला आहे. डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, १९ रुपयांचा प्लॅन २२ रुपयांचा आणि ३९ रुपयांचा प्लॅन ४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची ​​वैधता १ आणि ३ दिवसांची आहे. तर अनलिमिटेड कॉल प्लानबद्दल बोलायचे झाल्यास २८ दिवसांसाठी १७९ रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी आता १९९ रुपये मोजावे लागणार आहेत.



पोस्ट-पेड प्लानचे रिचार्ज 


पोस्ट-पेड प्लॅनमध्ये ४०१,५०१ रुपयांचे Indivisual Monthly Rental आता ४५१,५५१ रुपये झाले आहे. Family Plan Recharge ६०१, १००१ रुपयांवरून ७०१, १२०१ रुपयांपर्यंत वाढला आहे.



जिओ आणि एअरटेलचे काय आहेत दर?



  • एअरटेलने टॅरिफमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. नवीन प्लाननुसार, आता १७९चा प्लान १९९ रुपयांत मिळणार आहे. प्रीपेड दर दररोज सरासरी ७० पैशांनी वाढले आहेत. पोस्टपेड योजना १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता ४४९ रुपयांना मिळणार आहे. हे वाढलेले दर ३ जुलैपासून लागू होतील.

  • रिलायन्स जिओनेही रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. बुधवारी कंपनीने, याबाबत माहिती दिली आहे. जिओकडून सांगण्यात आले की, ३ जुलैपासून रिचार्ज प्लॅन १५ ते २५ टक्क्यांनी महाग होणार आहेत.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी