महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा; आमदार नितेश राणे यांची विधानसभेत मागणी

मुंबई : महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट स्टेटस ठेवणे असे प्रकार महाराष्ट्र राज्यात सातत्याने वाढू लागले आहेत. छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांची कोणत्याही व्यक्तीने विटंबना करू नये. आपले आदर्श असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पहाणारे जिहादी विचाराचे जे लोक आहेत त्यांना अद्दल घडावी यासाठी विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने कडक कायदा अमलात आणावा, अशी मागणी कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली.


महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरलेले होते. याला कारण हडपसरला अशी घटना घडली, जिथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर एका जिहादी विचाराच्या तरुणाने जाऊन दगडफेक केली. तो पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात जागो-जागी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला हिंदुत्ववादी विचाराचे तरुण रस्त्यावर उतरले. संतापले होते. कारण महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना करण्याचे प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये वाढले आहेत. महापुरुषांच्या विरोधात स्टेटस ठेवण्याचे स्टेटस ठेवण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. या सर्वाला कायद्याने आळा घालता येईल, अशी आग्रही भूमिका आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस