Nashik accident : मद्यधुंद अवस्थेत कारला तर ठोकलंच पण नागरिकांवरही केली गुंडगिरी!

  59

बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत नाशिकच्या तरुणाचा पराक्रम


नाशिक : राज्यात दिवसेंदिवस अपघातांच्या घटना वाढताना (Accident news) दिसत आहेत. त्यातच पुणे पोर्शे अपघातनंतर अनेक हिट अँड रनच्या घटनाही समोर आल्या. त्यातच आता नाशिकमधून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. यात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने समोरुन येणाऱ्या महिलेच्या कारला धडक दिली. इतकंच नव्हे तर मदतीसाठी आलेल्या नागरिकांवरही त्याने दमदाटी केली.


मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरातून ही घटना समोर आली आहे. मद्यधुंद कार चालकाने एका महिलेच्या कारला धडक दिली. समोरासमोर अपघात झाल्याने यात महिला चालक जखमी झाली. अपघातानंतर आपली बहिण पोलीस दलात असल्याचे सांगत मद्यधुंद तरुणाने महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या नागरिकांवर गुंडगिरी केली. हा प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत घडला.


दरम्यान, हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तरुणाच्या दमबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अंबड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या