मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Assembly Election) येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांना खूश करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच्या लाडली बहन योजनेप्रमाणे आता महाराष्ट्रातही ‘माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर करण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत राज्याचे बजेट सादर केले (Maharashtra Budget 2024). या बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यासोबत लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा या सारख्या योजनांचा देखील समावेश आहे.
स्त्री हा कुटुंबाचा आधार असून संपूर्ण घराचे व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढताना दिसून येते. अशा कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देत त्यांना सुवर्णसंधी मिळवून देण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील २५ लाख महिलांना प्रतिमाह १५०० हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महिलांना स्वयंरोजगार आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील १७ शहरात १० हजार महिलांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल ८० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी ‘हर घर नल, हर घल जल’ योजनेतर्तंगत उर्वरित टप्प्यातील काम पूर्ण करुन घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचवले जाईल.
महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील. राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…