Jio आणि Airtel युजर्स स्वस्तामध्ये करू शकता रिचार्ज, २ जुलैपर्यंत आहे संधी

मुंबई: जिओ(jio) आणि एअरटेलने(airtel) आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांनी आपले प्लान्स ६०० रूपयांपर्यंत महाग केले आहेत. नव्या किंमती ३ जुलैपासून लागू होणार आङेत. कंपन्यांनी एक अथवा दोन रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत बदल केलेले नाहीत तर संपूर्ण पोर्टफोलिओ अपडेट केला आहे.


अशातच ग्राहकांसमोर एक मोठे आव्हान आहे आपल्या रिचार्ज प्लान्सबद्दल. जिओ आणि एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. दरम्यान, प्रीपेड युजर्सकडे ३ जुलैच्या आधी एक खास संधी आहे.



काय करू शकतात युजर्स?


जर तुम्ही कमी किंमतीत आपली सर्व्हिस अॅक्टिव्ह ठेवत आहात तर तुम्ही अॅडव्हान्समध्ये रिचार्ज करू शकता. म्हणजेच तुम्ही सध्याचा प्लान संपण्याआधी नवा रिचार्ज करू शकता. मात्र यानंतर अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की या स्थिती तुम्हाला पूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल का?


म्हणजेच जुन्या आणि नव्या दोन्ही प्लान्सच्या संपूर्ण व्हॅलिडिटीचा फायदा मिळेल. एअरटेलने हे ही म्हटले आहे की ७३० दिवसांच्या वर व्हॅलिडिटीसाठी हे नियम लागू होणार नाहीत.


जिओ आणि एअरटेल दोघांनी आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओचा महिन्याचा प्लान आता १८९ पासून सुरू होईल. हा प्लान आधी १५५ रूपयांना होता. हा प्लान २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत येतो.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

तब्बल २८ तासांच्या प्रयत्नानंतर जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जुन्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून त्यांना कार्यक्षम, सुरक्षित आणि दीर्घकालीन