IND vs SA Final: फायनलवर पावसाचे सावट, जर सामना रद्द झाला तर कोण बनणार चॅम्पियन?

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४चा(t-20 world cup 2024) फायनल सामना बार्बाडोस स्थित केनसिंगटन ओव्हल स्टेडियममध्ये खेळवला जाईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा खिताबी सामना २९ जूनला होणार आहे. मात्र आतापर्यंत वर्ल्डकपच्या अनेक सामन्यांमध्ये पावसाचा खेळ रंगला आहे.


आता बातमी समोर आली आहे की २९ जूनला बार्बाडोसमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. दरम्यान फायनल सामन्यासाठी ३० जूनचा दिवस रिझर्व्ह डे म्हणून ठेवला आहे. जर २९ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे खेळला गेला नाही तर त्या स्थितीत काय होईल?



जर भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात आला पाऊस


भारत वि दक्षिण आफ्रिका फायनल सामन्याच्या दिवशी बार्बाडोसमध्ये ७५ टक्के पावसाची शक्यता आहे. जर फायनल सामना पावसामुळे अथवा अन्य कारणामुळे उशिराने होत असेल तर त्या दिवशी सामना पूर्ण करण्यासाठी १९० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागेल. सामन्याचे निकाल तेव्हाच लागू शकतात जेव्हा दोन संघ कमीत कमी १०-१० षटकांचा खेळ करेल. जर एखादा संघ १०-१० षटकांचा खेळ करू शकले नाही तर सामना रिझर्व्ह डेच्या दिवशी शिफ्ट केला जाईल.



जर रिझर्व्ह डेच्या दिवशी झाला पाऊस


आयसीसीच्या नियमांतर्गत फायनल सामना होऊ शकला नाही अथवा टाय झाल्यास सुपर ओव्हर केली जाऊ शकते. जर रिझर्व्ह डेला कोणताही संघ विजेता बनू शकला नाही अथवा सुपर ओव्हरही झाली नाही तर फायनल सामन्याचा निकाल नो-रिझल्ट म्हणून घोषित केला जाईल. सुपर ओव्हर नसल्याच्या स्थिती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जाईल. दरम्यान, टी-२० वर्ल्डकच्या १७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेतेपद दिले गेलेले नाही.

Comments
Add Comment

Italian Open 2026 Jannik Sinner : जॅनिक सिनर ठरला इटालियन ओपनचा विजेता; केली नोव्हाक जोकोविचच्या विक्रमाशी बरोबरी

- जॅनिक सिनर ठरला करिअर गोल्डन मास्टर्स पूर्ण करणारा जगातील दुसरा टेनिसपटू जॅनिक सिनरने इटालियन ओपन २०२६ चे

IPL 2026 DC vs RR : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर ५ विकेट्सने मात

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमधील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली

Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा

Indian Cricket Team : टीम इंडियात फेरबदलाचे संकेत; पंतकडून उपकर्णधारपद काढून घेण्याची शक्यता!

मुंबई : सध्या IPL २०२६ चा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्लेऑफमध्ये कोणते संघ स्थान मिळवणार याकडे क्रिकेट

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या