मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session of Legislature) आज दुसरा दिवस असून विधानभवनाबाहेर (Vidhanbhavan) दूध उत्पादक शेतकरी (Dairy farmers) आक्रमक झाले आहेत. दुधाला योग्य दर मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहेत. या संतापातच त्यांनी विधानभवनाबाहेर दूध ओतून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या प्रतिलीटर दूधाला ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी हातामध्ये सरकारविरोधातील फलक घेऊन त्यांनी आदोलन केले. १५ हजार टन दूध पावडर आयात का केली जातेय असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच प्रतिलीटर दुधाला ४० रुपये भाव मिळावा अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. यावेळी विधानभवनाबाहेर काही आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, एकीकडे विधानभवनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे दूध दरवाढीमुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. याप्रकरणी सध्या महाराष्ट्रभर ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…