देहू : आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला जातात. आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी (Dehu) सज्ज झाली असून प्रशासनही (Administration) वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. भाविक व वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्रासह पालखी परिसरात स्वच्छतेची काळजी देखील घेतली जात आहे.
अशातच आज संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. यामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यासोबत वारकरी पूजाअर्चा व भजन करीत असल्याने सध्या देहूत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. परिसरात तुरळक पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. तर ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…