Ashadhi Wari : तुकोबा विठोबाच्या भेटीला! भक्तीमय वातावरणात प्रशासनाची वारीसाठी जय्यत तयारी

पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सजली


देहू : आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला जातात. आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पायी पालखी सोहळ्यासाठी देहूनगरी (Dehu) सज्ज झाली असून प्रशासनही (Administration) वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी सज्ज झाले आहे. भाविक व वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्रासह पालखी परिसरात स्वच्छतेची काळजी देखील घेतली जात आहे.


अशातच आज संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. यामुळे परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यासोबत वारकरी पूजाअर्चा व भजन करीत असल्याने सध्या देहूत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान व नगरपंचायत प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.



भाविकांची राहण्यासाठी तारांबळ 


विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमन मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर, अनगडशहावली दर्गा परिसरात भाविकांची गर्दी आहे. परिसरात तुरळक पाऊस पडत असल्याने भाविकांची राहण्यासाठी तारांबळ उडत आहे. तर ठिकठिकाणी मोठ्या गृह प्रकल्पांच्या पार्किंगमध्ये, खासगी व प्राथमिक शाळेच्या आवारात व वर्ग खोल्यांमध्ये तात्पुरती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



प्रस्थान कार्यक्रम



  • पहाटे ४.३० - महापूजा

  • ५ ते ७ - काकडा

  • ८ ते ९ - गाथा भजन

  • १० ते १२ - काल्याचे किर्तन

  • १२ ते १ - जरीपटका सन्मान

  • १ ते २ - पादुका पूजन व सत्कार

  • दुपारी २ - पालखी प्रस्थान

  • सायंकाळी ६ - पालखी मुक्काम

  • रात्री ९ ते ११ - किर्तन, जागर


महापालिकेची तयारी



  • शीघ्रकृती दलाचे स्वतंत्र पथक

  • सोहळ्यावर ड्रोनद्वारे नजर

  • मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधा

  • दिंडीप्रमुखांचा सत्कार

  • पालखी मार्गावर वृक्षारोपण

  • फिरती शौचालये, तात्पुरती स्नानगृहे

  • वीस हजार सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध

Comments
Add Comment

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी